शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मीरा-भाईंदरच्या ‘क्लस्टर’चा प्रस्ताव शासनाने मागवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

मीरा रोड : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुन्या व धोकादायक इमारतींचा विकास ‘क्लस्टर’ योजने अंतर्गत करण्याचा प्रस्ताव ...

मीरा रोड : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुन्या व धोकादायक इमारतींचा विकास ‘क्लस्टर’ योजने अंतर्गत करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने महापालिकेकडून मागवला असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली. यामुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होऊन हजारो कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक, जुन्या इमारती आहेत. परंतु, जमिनीच्या मालकी हक्कापासून वाढीव प्रमाणात झालेले बांधकाम आणि विकास नियंत्रण नियमावलीतले नियम आदी अनेक कारणांनी शेकडो इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. अनेक धोकादायक इमारती मोडकळीस आल्या असून, रहिवासी जीव मुठीत धरून जगत आहेत. इमारत कोसळून अनेकांचे जीव गेले आहेत. अशा इमारतींत राहणारे हजारो कुटुंबीय हक्काच्या घरापासून वंचित आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण सतत पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या ह्या पुनर्विकासाच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केले. आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर मीरा-भाईंदरसाठी अनेक योजना व विकासकामे मार्गी लावण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले.

ग्रामपंचायत काळात कुठलेही बांधकाम नकाशे मंजूर न करता अतिशय दाटीवाटीने या इमारती बांधलेल्या आहेत. त्यामुळे समूह विकास (क्लस्टर) योजनेशिवाय या जुन्या इमारती विकसित होऊ शकत नाहीत. त्यातच शहराच्या तिन्ही बाजूला खाडी व समुद्रकिनारा असल्याने या शहरातील जमीन इतर शहरातील जमिनीपेक्षा दलदलीची असल्याचे आ. सरनाईक म्हणाले.

विधानसभा अधिवेशनातसुद्धा क्लस्टर योजना लागू करावी यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यावर ठाण्यात ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर एमएमआर क्षेत्रातील इतर महानगरपालिकांमध्ये ती कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.