शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! निर्बंधांच्या चौकटीत पार पडत आहेत विवाह सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. लग्न सोहळ्यांवरदेखील नियमांचे बंधन आले आहे. या नियमांमुळे काहींनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे, तर काहीजणांनी या नियम आणि अटींच्या चौकटीत विवाह सोहळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेले लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच काही अटींच्याआधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करावे लागत असल्याने काहींनी नोंदणी पद्धतीनेदेखील विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

-----------------------------

लग्नासाठी वधू-वरांच्या कुटुंबाला परवानगीसाठी फार धावपळ करावी लागत नाही. जे पाहुणे येणार आहेत त्यांची यादी पोलीस स्टेशनला तसेच, हॉल व्यवस्थापकाला द्यावी लागते किंवा हॉल मालकाला दिल्यावर ते पोलिसांना देतात, असे कुटुंबीयांनी सांगितले.

-----------------------------

लग्न सोहळ्यासाठी शहरात हॉलमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे तसेच, सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे तसेच, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.

-----------------------------

जुलै महिन्यात विवाहासाठी ०१, ०२, ०३ आणि १३ जुलै हे शुभ मुहूर्त आहेत. परंतु, ज्यांना हॉल मिळत नाही, अशांसाठी काढीव गौण मुहूर्तदेखील काढले आहेत. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासातही मुहूर्त दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै हे काढीव मुहूर्त आहेत.

------------------------------

कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटले, तर धावपळ सुरू आहे. कारण कोणाला बोलवायचे आणि कोणाला टाळायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. कोणाचे मन न दुखवता आमंत्रणे टाळायची आहेत आणि हा मोठा पेचप्रसंग समोर आहे. सध्या आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत.

- बन्सी बारावकर, वरपिता

------------------------------

५० लोकांमध्ये विवाह करणे म्हणजे अनेक नातेवाईकांची मन दुखावणे आहे. त्यामुळे निर्बंध उठल्यावरच आम्ही विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरवू आणि त्याचदिवशी शुभमंगल सावधान करू, अशी भूमिका काही कुटुंबांनी घेतली आहे.