शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! निर्बंधांच्या चौकटीत पार पडत आहेत विवाह सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. लग्न सोहळ्यांवरदेखील नियमांचे बंधन आले आहे. या नियमांमुळे काहींनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे, तर काहीजणांनी या नियम आणि अटींच्या चौकटीत विवाह सोहळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेले लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच काही अटींच्याआधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करावे लागत असल्याने काहींनी नोंदणी पद्धतीनेदेखील विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

-----------------------------

लग्नासाठी वधू-वरांच्या कुटुंबाला परवानगीसाठी फार धावपळ करावी लागत नाही. जे पाहुणे येणार आहेत त्यांची यादी पोलीस स्टेशनला तसेच, हॉल व्यवस्थापकाला द्यावी लागते किंवा हॉल मालकाला दिल्यावर ते पोलिसांना देतात, असे कुटुंबीयांनी सांगितले.

-----------------------------

लग्न सोहळ्यासाठी शहरात हॉलमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे तसेच, सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे तसेच, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.

-----------------------------

जुलै महिन्यात विवाहासाठी ०१, ०२, ०३ आणि १३ जुलै हे शुभ मुहूर्त आहेत. परंतु, ज्यांना हॉल मिळत नाही, अशांसाठी काढीव गौण मुहूर्तदेखील काढले आहेत. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासातही मुहूर्त दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै हे काढीव मुहूर्त आहेत.

------------------------------

कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटले, तर धावपळ सुरू आहे. कारण कोणाला बोलवायचे आणि कोणाला टाळायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. कोणाचे मन न दुखवता आमंत्रणे टाळायची आहेत आणि हा मोठा पेचप्रसंग समोर आहे. सध्या आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत.

- बन्सी बारावकर, वरपिता

------------------------------

५० लोकांमध्ये विवाह करणे म्हणजे अनेक नातेवाईकांची मन दुखावणे आहे. त्यामुळे निर्बंध उठल्यावरच आम्ही विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरवू आणि त्याचदिवशी शुभमंगल सावधान करू, अशी भूमिका काही कुटुंबांनी घेतली आहे.