शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! निर्बंधांच्या चौकटीत पार पडत आहेत विवाह सोहळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. लग्न सोहळ्यांवरदेखील नियमांचे बंधन आले आहे. या नियमांमुळे काहींनी आपला विवाह सोहळा पुढे ढकलला आहे, तर काहीजणांनी या नियम आणि अटींच्या चौकटीत विवाह सोहळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेले लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच काही अटींच्याआधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करावे लागत असल्याने काहींनी नोंदणी पद्धतीनेदेखील विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

-----------------------------

लग्नासाठी वधू-वरांच्या कुटुंबाला परवानगीसाठी फार धावपळ करावी लागत नाही. जे पाहुणे येणार आहेत त्यांची यादी पोलीस स्टेशनला तसेच, हॉल व्यवस्थापकाला द्यावी लागते किंवा हॉल मालकाला दिल्यावर ते पोलिसांना देतात, असे कुटुंबीयांनी सांगितले.

-----------------------------

लग्न सोहळ्यासाठी शहरात हॉलमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे तसेच, सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे तसेच, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.

-----------------------------

जुलै महिन्यात विवाहासाठी ०१, ०२, ०३ आणि १३ जुलै हे शुभ मुहूर्त आहेत. परंतु, ज्यांना हॉल मिळत नाही, अशांसाठी काढीव गौण मुहूर्तदेखील काढले आहेत. आषाढी एकादशीनंतर चातुर्मासातही मुहूर्त दिले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २२, २५, २६, २८ आणि २९ जुलै हे काढीव मुहूर्त आहेत.

------------------------------

कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटले, तर धावपळ सुरू आहे. कारण कोणाला बोलवायचे आणि कोणाला टाळायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. कोणाचे मन न दुखवता आमंत्रणे टाळायची आहेत आणि हा मोठा पेचप्रसंग समोर आहे. सध्या आम्ही द्विधा मन:स्थितीत आहोत.

- बन्सी बारावकर, वरपिता

------------------------------

५० लोकांमध्ये विवाह करणे म्हणजे अनेक नातेवाईकांची मन दुखावणे आहे. त्यामुळे निर्बंध उठल्यावरच आम्ही विवाह सोहळ्याचा मुहूर्त ठरवू आणि त्याचदिवशी शुभमंगल सावधान करू, अशी भूमिका काही कुटुंबांनी घेतली आहे.