शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

अन्य समाजांना आरक्षण दिल्याने आमच्या वाटणीत फरक पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता ...

कल्याण : राजर्षी शाहू राजांनी आरक्षण लागू केले. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वाटेचा महामार्ग केला. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. मराठा, मुस्लीम, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण मिळावे. त्यांना आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणाच्या वाट्यात कुठेही फरक पडत नाही, अशी भूमिका बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी मांडली आहे.

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त ढोबळे यांची ५० कार्यकर्त्यांसह १८ जुलैपासून नवनिर्धार संवाद यात्रा राज्यभरात सुरू आहे. नंदुरबारपासून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान त्यांनी २८ जिल्ह्यांतील मातंग वस्त्यांवर भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. या यात्रेचा समारोप घाटकोपरच्या चिरागनगर येथे ५ सप्टेंबरला होणार आहे. ही यात्रा शुक्रवारी कल्याणमध्ये दाखल झाली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी ॲड. कोमल साळुंखे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, प्रा. गिरीश लटके, बाबा रामटेके आदी उपस्थित होते.

ढोबळे म्हणाले, अ, ब, क आणि ड या प्रमाणे आरक्षण द्यावे. ‘अ’ गटात बौद्ध समाज, ‘ब’ गटात मातंग समाज, ‘क’ गटात होलार, चर्मकार, ढोर या जातींचा समावेश करावा आणि ‘ड’ गटात अन्य ६९ जातींचा समावेश करावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, तिचा विचार होत नाही. हीच मागणी एखाद्या साखर संघाने केली, तर ती लगेच मान्य केली जाते. साखर संघाची मागणी मान्य केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, आमची मागणी पूर्ण केली नाही, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. लहान समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी या यात्रेतून जनजागृती करण्यात आली आहे. वाडी-वस्त्यांवरील शिक्षणाला चालना मिळावी, याकडे ढोबळे यांनी लक्ष वेधले आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या ॲड. कोमल साळुंखे यांनी जाहीर निषेध केला. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना चांगली अद्दल घडविली जावी. शहरातील महिला अधिकारी सुरक्षित नसेल, तर गाव-खेड्यांतील बाईच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल त्यांनी केला.

--------