शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आम्हाला आमची जागा परत द्या; पोलिसांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:27 IST

शहरातील जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने प्रांत कार्यालय कोणत्याही चौकशीविना बंद वसाहती व विविध सरकारी कार्यालयांच्या कब्जातील जागेवर सनद देण्याचे काम सुरू केले.

उल्हासनगर : प्रांत कार्यालयाने पोलीस वसाहतींवर सनद देण्याचा प्रकार उघड झाल्यावर महापालिकेसह विविध सरकारी विभागांचे धाबे दणाणले आहे. पोलीस ठाणे, पोलीस वसाहतीसह आरक्षित भूखंडाला मिळकतपत्र पोलीस प्रशासनाच्या नावे द्या, अशी मागणी पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी प्रांत कार्यालयाला केली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं.-४, विठ्ठलवाडी पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस वसाहतींवर प्रांत कार्यालयाने चौकशीविना सनद दिल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. त्यानंतर, पोलीस प्रशासनाला जाग येऊन सहायक पोलीस आयुक्तासह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली. सनद दिलेली जागा पोलीस वसाहतीची असल्याची माहिती प्रांत कार्यालयाला दिली. वसाहतीच्या बैठ्या चाळी धोकादायक असल्याने वसाहतींच्या खोल्या बंद ठेवल्याची माहिती प्रांताधिकारी जगजितसिंग गिरासे यांना दिली. तेव्हा चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले.

शहरातील जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याने प्रांत कार्यालय कोणत्याही चौकशीविना बंद वसाहती व विविध सरकारी कार्यालयांच्या कब्जातील जागेवर सनद देण्याचे काम सुरू केले. यामध्ये भूमाफिया, प्रांत कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी, स्थानिक नेते गुंतल्याची चर्चा सुरू होऊन कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची टीका होत आहे. महापालिका मुख्यालय, प्रभाग समितीसह इतर कार्यालये व आरक्षित भूखंड, उद्याने, मैदाने बनावट सनदच्या संकटात सापडली. सनद प्रकाराची भीती विविध सरकारी कार्यालये व त्यांच्या खुल्या जागेला निर्माण झाली आहे. त्यांच्या जागेची मालकी अद्यापही राज्य सरकारची असून त्यांनी स्वत: पाठपुरावा करून मिळकतपत्र घेणे गरजेचे झाले आहे.

जागेची मालकी राज्य सरकारचीमहापालिका मुख्यालयासह इतर कार्यालये, पोलीस ठाणी, पोलीस बंद वसाहतींसह त्यांच्या खुल्या जागेची मालकी राज्य सरकारची आहे. ताब्यातील जागा स्वत:च्या नावाने करण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी प्रांत कार्यालयाने महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर हिराघाट, आयडीआय कंपनीजवळील भूखंड, व्हीटीसी मैदाने व इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेची मालकी महापालिकेकडे प्रांत कार्यालयाने हस्तांतरित केली आहे. तशीच जागेची मालकी हस्तांतरित केली.

बंद खुल्या जागा धोक्यातशहरातील एमजेपीच्या खुल्या जागा व बंद वसाहती, सरकारी बालगृहे, वसतिगृहे, सरकारी विश्रामगृह, पोलीस ठाणे व बंद वसाहती, सरकारी गोदामाच्या जागांवरील बंद गोदामे, पालिकेचे आरक्षित भूखंड, जुन्या आयटीआय केंद्राची जागा, खुली बीएसएनएलची जागा आदी अनेक सरकारी कार्यालयांच्या जागेवर केव्हाही सनद मिळण्याची भीती निर्माण झाली. सनद टाळण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा करून जागेची मालकी मिळवणे गरजेचे झाले आहे.