शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

लॉकडाऊनमधून आम्हाला सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:36 IST

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन ...

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी केली आहे. परंतु, या लॉकडाऊनमधून राज्यातील लघु उद्योगांना वगळण्यात यावे, अशी मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये लघु उद्योग आजारी पडले आहेत, ते अद्यापही सावरू शकलेले नाहीत. त्यात पुन्हा लॉकडाऊनमध्ये हे उद्योग बंद केले तर महाराष्ट्रातील उद्योगांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट केले.

मागील काही वर्षांत या उद्योगांना उतरती कळा आल्याने अनेक उद्योग बंद झालेले आहेत. आता कमी प्रमाणात हे उद्योग सुरू आहेत. त्यात मागील वर्षीच्या लॉकडाऊनचा फटका या उद्योगांना बसला. त्यामुळे आता हे उद्योग आजारी पडले आहेत, त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही अनेक लघु उद्योग प्रतिकूल परिस्थितीतून जात आहेत. आताचा नियोजित लॉकडाऊन हा राष्ट्रीय स्तरावरचा नसल्याने महाराष्ट्र राज्यात परत लॉकडाऊन जाहीर केल्यास महाराष्ट्रातील उद्योगांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किंबहुना राज्यातील उद्योग परराज्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यास आणि व्हॅकेशनसाठी एकदा उद्योगातील कामगार परराज्यात त्यांच्या गावी गेल्यास परत येणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे त्याचा फटका उद्योग क्षेत्रास बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे उद्योगांचे कंबरडे मोडणार असून ते देशोधडीला लागतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

औद्योगिक क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या सर्व अटी व शर्तीचे काटेकोरपणे पाळण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे उद्योजकांनी कोरोनाच्या आरटीपीसीआर/अँटिजेन चाचण्या तसेच लसीकरणसुद्धा करण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही शासनाच्या कोविडविषयी मार्गदर्शक सूचना काटेकोरपणे पाळण्याची तयारी आहे. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण औद्योगिक क्षेत्रास प्रस्तावित लॉकडाऊन मधून वगळण्यात यावे, अशी विनंती ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.