शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नेवाळीतील शेतकऱ्यांना दिलासा देणार

By admin | Updated: July 9, 2017 01:50 IST

नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा

- लोकमत न्यूज नेटवर्क

डेंबिवली : नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.नेवाळी येथे झालेल्या आंदोलनानंतर आगरी, कोळी व कुणबी समाजात अस्वस्थता आहे. त्यासंदर्भात शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिरात समाजबांधवांची बैठक झाली. याप्रसंगी समाजातील लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ व्यक्ती, डॉक्टर, उद्योगपती, अभियंते आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत समाजाच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर खासदार पाटील यांनी शनिवारी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्या वेळी आमदार गणपत गायकवाड, बाळाराम पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना उपनेते अनंत तरे व सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात व्यक्त झालेला आक्रोश त्यांनी मांडला.भूमिपूत्र असलेल्या आगरी, कोळी व कुणबी समाजाच्या अस्वस्थतेकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. वर्षानुुवर्षे कसणाऱ्या जमिनीचा त्याग केल्यानंतरही अद्यापी समाजाला संघर्ष करावा लागतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर लवकरच नेवाळीबाबत निर्णय होऊन शेतकऱ्यांसह समाजाला दिलासा मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याशी संपर्क साधून बैठक घेतली जाईल. त्यात नेवाळीबाबत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलनातील एकाही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.पोलीस आयुक्तांचाही दिलासा : नेवाळीतील आंदोलनाबाबत निरपराध व्यक्तींना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले. सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीने शनिवारी त्यांचीही भेट घेतली. गावांमधील वातावरण सामान्य स्थितीत आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे, असे परमबीर सिंग म्हणाल्याचे खासदार पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.