शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी ...

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. दहावीला दाेन वेळा नापास झाल्यामुळे तिने घर साेडल्यानंतर दाेन वर्षांनी स्वच्छेने लग्न केल्याचा दावाही केल्याचे चाैकशीत पाेलिसांना तिने सांगितले. चार वर्षांपूर्वी (२०१७) ही १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना उल्हासनगर येथे घडली होती. ती आता २० वर्षांची आहे. दहावी परीक्षेत दोन वेळा नापास झाल्याने पालक ओरडतील, या भीतीपोटी ती घरातून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस उघडकीस आली आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता; मात्र तिचे कोणीही अपहरण केले नव्हते. ती स्वतःच घर सोडून गेल्याचेही स्पष्ट झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

उल्हासनगर येथील भोला यादव (नावात बदल) यांनी त्यांची १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार २१ जून २०१७ ला दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र चार वर्षे उलटूनही तिचा शोध लागला नव्हता. अखेर ठाण्याचे पाेलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या घटनेचा तपास २३ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे सोपविला. पाेलीस निरीक्षक अशाेक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उप-निरीक्षक बी. डी. औटी यांचे पथक या घटनेचा तपास करीत हाेते.

ओळखीच्या तरुणाशी केले लग्न

ही मुलगी १५ सप्टेंबर २०२१ ला ठाण्यातील कोर्टनाका परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोर्टनाका परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका लहान मुलासह एक महिला तिथे आली. घर सोडून गेल्यानंतर तिने १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ओळखीच्या एका तरुणाशी लग्न केल्याचेही तपासातून समोर आले आहे.

--------------------------