शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी ...

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. दहावीला दाेन वेळा नापास झाल्यामुळे तिने घर साेडल्यानंतर दाेन वर्षांनी स्वच्छेने लग्न केल्याचा दावाही केल्याचे चाैकशीत पाेलिसांना तिने सांगितले. चार वर्षांपूर्वी (२०१७) ही १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना उल्हासनगर येथे घडली होती. ती आता २० वर्षांची आहे. दहावी परीक्षेत दोन वेळा नापास झाल्याने पालक ओरडतील, या भीतीपोटी ती घरातून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस उघडकीस आली आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता; मात्र तिचे कोणीही अपहरण केले नव्हते. ती स्वतःच घर सोडून गेल्याचेही स्पष्ट झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

उल्हासनगर येथील भोला यादव (नावात बदल) यांनी त्यांची १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार २१ जून २०१७ ला दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र चार वर्षे उलटूनही तिचा शोध लागला नव्हता. अखेर ठाण्याचे पाेलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या घटनेचा तपास २३ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे सोपविला. पाेलीस निरीक्षक अशाेक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उप-निरीक्षक बी. डी. औटी यांचे पथक या घटनेचा तपास करीत हाेते.

ओळखीच्या तरुणाशी केले लग्न

ही मुलगी १५ सप्टेंबर २०२१ ला ठाण्यातील कोर्टनाका परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोर्टनाका परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका लहान मुलासह एक महिला तिथे आली. घर सोडून गेल्यानंतर तिने १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ओळखीच्या एका तरुणाशी लग्न केल्याचेही तपासातून समोर आले आहे.

--------------------------