शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी ...

ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. दहावीला दाेन वेळा नापास झाल्यामुळे तिने घर साेडल्यानंतर दाेन वर्षांनी स्वच्छेने लग्न केल्याचा दावाही केल्याचे चाैकशीत पाेलिसांना तिने सांगितले. चार वर्षांपूर्वी (२०१७) ही १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना उल्हासनगर येथे घडली होती. ती आता २० वर्षांची आहे. दहावी परीक्षेत दोन वेळा नापास झाल्याने पालक ओरडतील, या भीतीपोटी ती घरातून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस उघडकीस आली आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता; मात्र तिचे कोणीही अपहरण केले नव्हते. ती स्वतःच घर सोडून गेल्याचेही स्पष्ट झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

उल्हासनगर येथील भोला यादव (नावात बदल) यांनी त्यांची १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार २१ जून २०१७ ला दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र चार वर्षे उलटूनही तिचा शोध लागला नव्हता. अखेर ठाण्याचे पाेलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या घटनेचा तपास २३ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे सोपविला. पाेलीस निरीक्षक अशाेक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उप-निरीक्षक बी. डी. औटी यांचे पथक या घटनेचा तपास करीत हाेते.

ओळखीच्या तरुणाशी केले लग्न

ही मुलगी १५ सप्टेंबर २०२१ ला ठाण्यातील कोर्टनाका परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोर्टनाका परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका लहान मुलासह एक महिला तिथे आली. घर सोडून गेल्यानंतर तिने १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ओळखीच्या एका तरुणाशी लग्न केल्याचेही तपासातून समोर आले आहे.

--------------------------