शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचत जावे!

By admin | Updated: May 7, 2017 05:50 IST

पुस्तकवाचनाची आवड जपणाऱ्यांनी आपल्याकडील दोन, तीन, चार तर अगदी ५० पुस्तके देऊन ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमाला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुस्तकवाचनाची आवड जपणाऱ्यांनी आपल्याकडील दोन, तीन, चार तर अगदी ५० पुस्तके देऊन ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमाला साथ दिली. ठाण्यातील वाचक शनिवारी भरभरून पुस्तके आणत होते अन् आवडलेले पुस्तक अगदी आवडीने नेत होते. ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे!, अखंड वाचत जावे’ या संकल्पनेवर आधारित पुस्तकाच्या देवाणघेवाणीचा आगळावेगळा उपक्रम ठाण्यात राबवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनचळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे, पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशांतही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले आहे. सर्वदूर पसरलेल्या या चळवळीशी ३५ हजार वाचक जोडले गेले, तर एक कोटी ७५ लाखांची सव्वालाख पुस्तके या चळवळीत प्राप्त झाली. वाचनालयापासून दूर गेलेल्या वाचकाला पुस्तकाच्या जवळ आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम. प्रत्येक वाचकाकडे किमान पाच ते सहा पुस्तके असतातच. ती वाचून झाल्यावर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशा वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून रानडे यांनी पुस्तकांच्या देवाणघेवाणीचा उपक्रम सुरू केला. वाचकांनी त्यांच्याकडील वाचून झालेली पुस्तके दुसऱ्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती पुस्तके देण्याची संकल्पना मांडली. नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू केल्यानंतर शनिवारी ठाण्यात त्याचा शुभारंभ झाला.रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत तळ मजला, ब्लॉक नंबर ३, बिल्डिंग नंबर १, घंटाळी सहनिवास, घंटाळी मंदिरमागे, नौपाडा, ठाणे (प.) येथे हा उपक्रम सुरू राहणार आहे.ठाणेकरांना या उपक्रमाची माहिती मिळताच सोसायटीच्या आवारात अर्धा तास आधीच ते उपस्थित राहिले होते. अनेकांनी आपल्याजवळची पुस्तके देऊन आपल्याला आवडलेली पुस्तके नेत होते. कोणी कथा, कादंबऱ्या, कोणी धार्मिक, तर काही जण अ‍ॅडव्हेंचर पुस्तके नेत होते. यात केवळ ज्येष्ठांचा नव्हे, तर अगदी शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग दिसून आला. ही संकल्पना सर्वांनाच आवडल्याचे भाव ठाणेकर वाचकांच्या चेहऱ्यावर होते. कोणी गाडीतून, कोणी रिक्षातून आपली पुस्तके पिशव्या भरून आणत होते. पुस्तकाच्या देवाणघेवाणीसाठी घंटाळी सहनिवासात भली मोठी रांग लागली होती. या उपक्रमात ८०० पुस्तके मांडण्यात आली होती. तसेच, नवीन पुस्तकांचादेखील यात समावेश होता. या नवीन पुस्तकांसाठी यामिनी पानगावकर, मिलिंद जोशी, रवींद्र अमृतकर, शुभांगी दातार यांचे अर्थसाहाय्य लाभल्याचे रानडे यांनी सांगितले. ठाण्यानंतर मुलुंडमध्ये २७ व २८ मे रोजी हा उपक्रम राबवला जाईल. त्यानंतर, जिथे बोलवतील तिथे पुस्तकांचा रथ घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले. पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाचनाचे प्रमाण अधिक वाढते. हे प्रमाण वाढावे, यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे. दर्जेदार पुस्तके या उपक्रमात उपलब्ध करून दिली आहेत. वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे. तसेच आपल्याला वेगळे पुस्तकवाचनाचा मिळणारा आनंद सर्वांना मिळावा, म्हणून आपल्याजवळील एक पुस्तक देऊन जावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक वाचकांच्या घरी वाचून झालेल्या पुस्तकांना नवीन वाचक मिळतील आणि स्वत:ही ग्रंथसंपन्न व्हाल, असेच या उपक्रमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. - विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान माझ्या घरातील मी ३७ पुस्तके या उपक्रमात दिली. मला आवडलेली मी दोन ते तीन पुस्तके घेतली. ही कल्पना खूप चांगली आहे. - मधुरा वैशंपायन, विद्यार्थिनीग्रंथवाचन आणि त्यांच्या प्रसारासाठी झपाटलेल्या माणसाने सर्वांना झपाटून टाकले. या उपक्रमात मी चार पुस्तके दिली असून दोन पुस्तके घेऊन जाणार आहे. -भा.वा. दाते, वाचकविनायक रानडे यांचे उपक्रम उत्तम आहेत. ज्या वेळी नाशिकमध्ये हा उपक्रम राबवला, तेव्हा त्यांना ठाण्यातही हा उपक्रम राबवण्यास सांगितले. आज या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.- यामिनी पानगावकर, सदस्य,ग्रंथ तुमच्या दारी