शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राजकीय साठमारीत सर्वसामान्य ग्राहकांचे हाल

By admin | Updated: July 13, 2016 01:56 IST

राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व असलेल्या बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले. त्यांनी शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा दिली

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व असलेल्या बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले. त्यांनी शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा दिली. त्याविरोधात बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला. मात्र या राजकीय साठमारीत बळी जातोय तो ग्राहकांचा. या बंदच्या नावाखाली बाजार समितीचा संबंध नसलेल्या बाजारपेठांतही भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ठाण्यात मोजका माल वाशीच्या बाजारपेठेतून येतो. काही नाशिकहून येतो, पण तरीही बंदचे कारण सांगत किरकोळ बाजारातील दर सतत वाढत आहेत. पाऊस लांबला तेव्हा पुरेशी आवक नसल्याचे कारण देत भाज्यांच्या दरांनी शंभरी गाठली होती. आताही बंदमुळे आवक नसल्याचे सांगत पुन्हा भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. शेवग्याच्या शेंगा, मटार आणि हिरव्या मिरच्यांनी तर दरात डबल सेंच्युरी मारली आहे. त्याचवेळी पालेभाज्यांनी मात्र थोडा दिलासा दिल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. गेले दोन महिने भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. ४०, ६०, ८० रूपये किलोच्या दरांत असलेल्या भाज्यांनी थेट दराची शंभरी ओलांडली आहे. स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावलेला टोमॅटो दरामुळेच लालबुंद झाला आहे. त्यानेही किलोमागे २० रूपयांनी भाव वाढवून घेतला आहे. त्याचवेळी पावसाचा आधार मिळाल्याने पालेभाज्यांचे दर मात्र आटोक्यात आहेत. मेथीची जुडी आकारानुसार ३० ते ४० रूपयांच्या घरात आहे. त्याचवेळी कोथिंबीरीचा गेल्या महिन्यातील तोरा उतरला असून तिची मोठी जुडी ४० रुपयांच्या दरम्यान आहे.