शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

मेळावे आणि अभियानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आगामी केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असताना राज्यात महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आगामी केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असताना राज्यात महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनपाची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादीचे मेळावे एकीकडे पार पडत असताना दुसरीकडे काँग्रेस आपल्या दारी या अभियानातून काँग्रेसनेदेखील निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. २०१५ च्या निवडणुकीत झालेला पराभव पाहता मेळावे आणि अभियान दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत कितपत यश मिळवून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१५ च्या मनपा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनुक्रमे अवघे चार आणि दोन नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने २००५ मध्ये अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादीलाही कालांतराने उतरती कळा लागली. दरम्यान, आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दोघांनीही सुरू केली आहे. कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या बैठकीत केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढविण्यावर एकमत झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेत अलीकडेच पार पडलेल्या मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष शिंदे आणि निरीक्षक प्रमोद हिंदुराव यांच्या प्रमुख उपस्थितीत चारही विधानसभा क्षेत्रांत मेळावे, बैठकांचे सत्र सुरू असून, त्याला कार्यकर्त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक नेत्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, हा उत्साह आणि जोश निवडणुकीपर्यंत कायम राहतो का, हेदेखील महत्त्वाचे आहे.

----------------------------------------------

...तर पदावरून काढून टाकले जाईल

काँग्रेस आपल्या दारी अभियानाला काँग्रेसकडून प्रारंभ झाला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे अभियान सुरू झाले असून, जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ३० सप्टेंबपर्यंत ते चालणार आहे. याअंतर्गत काँग्रेसची विचारधारा मानणारे सामाजिक कार्यकर्ते, तसेच काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन येणाऱ्या मनपा निवडणुकीसंदर्भात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्यात बूथ कमिटीपासून वॉर्ड कमिटीपर्यंत पुनर्रचना करण्याचे काम या अभियानांतर्गत चालणार आहे. जर कोणी बूथ कमिटी तर वॉर्ड कमिटीपर्यंत या अभियानांतर्गत तयारी नाही केली तर त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असा इशारा पोटे यांनी दिला आहे. कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जे राजकारणाविरहित सामान्यांसाठी काम करीत आहेत, त्यांच्या घरी भेट देऊन पक्षाची विचारधारा पुन्हा रुजविण्याचे काम या अभियानातून केले जाणार आहे.

------------------------------------------------------