शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जिल्ह्याला गारेगार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि अन्य गावपाड्यांना या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. मात्र, या चैत्र, वैशाखाच्या कडकडीत उन्हाळ्यात ही पाणीकपात थांबवण्याचा निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने गारेगार दिलासा दिला आहे.

‘पाणीकपात रद्दच्या हालचालींना जोर’ या मथळ्याखाली लोकमतने २६ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून गृहिणींना दिलासा दिला होता. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेऊन महिन्यातील दोन वेळची २४ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. पावसाळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर आला आहे. याशिवाय जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र, बारवी आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. एवढेच नव्हे तर यंदा प्रारंभापासून दमदार पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. त्यात कोरोनाचा काळ आणि कडक उन्हाळ्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. घशाला कोरड आणि घामाच्या धारांनी शरीरातील पाणी कमी होण्याचे सध्याचे अनुभव आहेत. परंतु, आता कपात थांबवल्याने नियमित व मुबलक पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या शहरांना त्यांचा मंजूर पाणीपुरवठा आता सुरळीत होईल. या शहरांना त्यांचा रोजचा तीन हजार ६२१ दश लक्ष लीटर (एमएलडी) हा मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गृहिणींची पाणीसमस्या आता दूर होऊन त्यांना या कडकडीत उन्हाळ्यात पापड, कुरड्या, शेवया आणि वाळवणासाठी व धुणीभांडीकरिता मुबलक पाणी वापरता येणार आहे. यासाठी मात्र स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणेत थातूरमातूर समस्या उद्भवणार असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे.

--------