शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पगार थकल्याने कचरा गाडीवरील कामगारांचे ‘कामबंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या कचरा कंत्राटदाराने त्याच्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचा पगार दिला नसल्याने संतप्त कामगारांनी बुधवारी काम बंद ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या कचरा कंत्राटदाराने त्याच्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचा पगार दिला नसल्याने संतप्त कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात कचरा उचलला गेला नाही.

केडीएमसीने चार प्रभागांतील कचरा उचलण्याचे कंत्राट आर ॲण्ड डी या कंपनीला दिले आहे. मनपा वर्षाला कंत्राटदाराला या कामापोटी १०७ कोटी रुपये बिल अदा करते. या कंपनीकडे २५० कामगार आहेत. या कामगारांपैकी ५० कामगारांनी बुधवारी कचरा न उचलता काम बंद आंदोलन केले. गौरीपाडा आणि वालधुनी परिसरात कामगारांनी आंदोलन केल्याने तेथील कचरा उचलला गेला नाही. परिणामी तेथे कचऱ्याचे ढीग पडून असल्याचे दिसून आले.

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून कंपनीने पगार दिलेला नाही. तीन महिन्यांचा पगार थकविल्यानंतर एक महिन्याचा पगार देऊ केला आहे. त्यातही २० टक्के कपात करून दिली जात आहे. कोरोनाकाळात नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी कचरा उचलणाऱ्या कामगारांनी जिवाची पर्वा न करता कचरा उचलला आहे.

दरम्यान, या कामगारांचा पगार थकल्याने अनेकांना आपल्या मुलांच्या शाळेची फी भरता आलेली नाही. घरात रेशन नाही, आदी समस्या भेडसावत असल्याची व्यथा कामगार हिरा भोईर यांनी मांडली. आम्हाला आमचा पगार द्यावा. आधीच आमचा पगार कमी आहे. त्यात कपात केली तर आमच्या हाती काय पडणार, असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे.

------

कंत्राटदार कंपनीला प्रशासनाने समज दिली आहे. काम योग्य प्रकारे न केल्यास कंपनीला प्रशासनाकडून दंड आकारला जातो. हा दंड आकारल्याने कंपनी कामगारांच्या पगारातून कपात करून दंडाची रक्कम भरून काढत असावी. मात्र, हा सगळाच प्रकार अयोग्य आहे. कामगारांना त्रास झाल्यास कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई केली जाईल.

- रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी

---------------------------