शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, प्रत्यक्षात कल्याण व डोंबिवली शहरांसह २७ गावांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा हद्दीतील सध्याच्या अंदाजे १८ लाख लोकसंख्येनुसार दररोज ८६६ टन कचरा तयार होतो. मात्र, मनपाच्या सांगण्यानुसार फक्त दररोज ५५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना असल्याचे दिसून येते, तर मग अन्य ३१६ टन कचऱ्यावर प्रक्रिया कोणी करायची? ही तर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. भाजप याचा निषेध करत असल्याचे पत्र कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.

मनपाच्या १२७ प्रभागांपैकी केवळ काही प्रभागांतच ओला व सुका कचरा जमा केला जात आहे. त्यातच उंबर्डे व बारावे येथील डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. साधारणपणे घनकचरा मार्गदर्शक मानकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी ४८१ ग्रॅम कचरा उत्पन्नाचे प्रमाण आहे. सद्यस्थितीत उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. आतापर्यंत आधारवाडी येथे टाकला जाणारा कचरा बारावे येथे ओला व सुका कचरा, असा एकत्रितपणे टाकला जात आहे. आयुक्त व संबंधित अधिकारी तेथे दुसरे आधारवाडी तयार करत असल्याची टीका कांबळे यांनी केली. ओल्या कचऱ्याच्या पुरवठ्याअभावी १० बायोगॅस प्रकल्पांपैकी फक्त चारच प्रकल्प कार्यान्वित आहेत. आयुक्तांना संबंधित अधिकारी ही चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीवर आयुक्तांनी विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.

स्वच्छ भारत अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळवणारी नवी मुंबई मनपा तसेच ठाणे मनपानेही कचऱ्यावर अधिभार लावलेला नाही. मात्र, केडीएमसीचे आयुक्त घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नसताना, हा अधिभार येथील नागरिकांवर का लादत आहेत? त्याला भाजपचा तीव्र विरोध असल्याचेही कांबळे म्हणाले.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे

कोरोनाकाळात नागरिकांवर कराचे ओझे वाढवून काय साध्य होणार आहे? सगळीकडे अस्वच्छता आहे, याचा विचार होणार आहे? की नाही, असा सवाल करत कांबळे म्हणाले की, अधिभार लावून निधी मिळवता येईल. पण त्याचा विनियोग कसा करायचा, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे राजकारण न करता समाजकारण करावे, असा टोलाही कांबळे यांनी विरोधकांना लगावला.

-----------