शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, प्रत्यक्षात कल्याण व डोंबिवली शहरांसह २७ गावांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा हद्दीतील सध्याच्या अंदाजे १८ लाख लोकसंख्येनुसार दररोज ८६६ टन कचरा तयार होतो. मात्र, मनपाच्या सांगण्यानुसार फक्त दररोज ५५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना असल्याचे दिसून येते, तर मग अन्य ३१६ टन कचऱ्यावर प्रक्रिया कोणी करायची? ही तर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. भाजप याचा निषेध करत असल्याचे पत्र कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.

मनपाच्या १२७ प्रभागांपैकी केवळ काही प्रभागांतच ओला व सुका कचरा जमा केला जात आहे. त्यातच उंबर्डे व बारावे येथील डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. साधारणपणे घनकचरा मार्गदर्शक मानकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी ४८१ ग्रॅम कचरा उत्पन्नाचे प्रमाण आहे. सद्यस्थितीत उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. आतापर्यंत आधारवाडी येथे टाकला जाणारा कचरा बारावे येथे ओला व सुका कचरा, असा एकत्रितपणे टाकला जात आहे. आयुक्त व संबंधित अधिकारी तेथे दुसरे आधारवाडी तयार करत असल्याची टीका कांबळे यांनी केली. ओल्या कचऱ्याच्या पुरवठ्याअभावी १० बायोगॅस प्रकल्पांपैकी फक्त चारच प्रकल्प कार्यान्वित आहेत. आयुक्तांना संबंधित अधिकारी ही चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीवर आयुक्तांनी विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.

स्वच्छ भारत अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळवणारी नवी मुंबई मनपा तसेच ठाणे मनपानेही कचऱ्यावर अधिभार लावलेला नाही. मात्र, केडीएमसीचे आयुक्त घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नसताना, हा अधिभार येथील नागरिकांवर का लादत आहेत? त्याला भाजपचा तीव्र विरोध असल्याचेही कांबळे म्हणाले.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे

कोरोनाकाळात नागरिकांवर कराचे ओझे वाढवून काय साध्य होणार आहे? सगळीकडे अस्वच्छता आहे, याचा विचार होणार आहे? की नाही, असा सवाल करत कांबळे म्हणाले की, अधिभार लावून निधी मिळवता येईल. पण त्याचा विनियोग कसा करायचा, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे राजकारण न करता समाजकारण करावे, असा टोलाही कांबळे यांनी विरोधकांना लगावला.

-----------