शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, प्रत्यक्षात कल्याण व डोंबिवली शहरांसह २७ गावांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा हद्दीतील सध्याच्या अंदाजे १८ लाख लोकसंख्येनुसार दररोज ८६६ टन कचरा तयार होतो. मात्र, मनपाच्या सांगण्यानुसार फक्त दररोज ५५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना असल्याचे दिसून येते, तर मग अन्य ३१६ टन कचऱ्यावर प्रक्रिया कोणी करायची? ही तर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. भाजप याचा निषेध करत असल्याचे पत्र कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.

मनपाच्या १२७ प्रभागांपैकी केवळ काही प्रभागांतच ओला व सुका कचरा जमा केला जात आहे. त्यातच उंबर्डे व बारावे येथील डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. साधारणपणे घनकचरा मार्गदर्शक मानकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी ४८१ ग्रॅम कचरा उत्पन्नाचे प्रमाण आहे. सद्यस्थितीत उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. आतापर्यंत आधारवाडी येथे टाकला जाणारा कचरा बारावे येथे ओला व सुका कचरा, असा एकत्रितपणे टाकला जात आहे. आयुक्त व संबंधित अधिकारी तेथे दुसरे आधारवाडी तयार करत असल्याची टीका कांबळे यांनी केली. ओल्या कचऱ्याच्या पुरवठ्याअभावी १० बायोगॅस प्रकल्पांपैकी फक्त चारच प्रकल्प कार्यान्वित आहेत. आयुक्तांना संबंधित अधिकारी ही चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीवर आयुक्तांनी विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.

स्वच्छ भारत अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळवणारी नवी मुंबई मनपा तसेच ठाणे मनपानेही कचऱ्यावर अधिभार लावलेला नाही. मात्र, केडीएमसीचे आयुक्त घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नसताना, हा अधिभार येथील नागरिकांवर का लादत आहेत? त्याला भाजपचा तीव्र विरोध असल्याचेही कांबळे म्हणाले.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे

कोरोनाकाळात नागरिकांवर कराचे ओझे वाढवून काय साध्य होणार आहे? सगळीकडे अस्वच्छता आहे, याचा विचार होणार आहे? की नाही, असा सवाल करत कांबळे म्हणाले की, अधिभार लावून निधी मिळवता येईल. पण त्याचा विनियोग कसा करायचा, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे राजकारण न करता समाजकारण करावे, असा टोलाही कांबळे यांनी विरोधकांना लगावला.

-----------