शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

ठाण्यात रात्रनिवाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, कोपरीतीसह दिव्यातील निवारा केंद्राला स्थानिक नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत विरोध केला. स्टेशनजवळ अशा प्रकारचे निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असताना गावात किंवा स्टेशनपासून लांबच्या अंतरावर ते सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले असल्याने या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.

स्टेशन सोडून इतर ठिकाणी तुम्हाला निवारा केंद्र सुरू करण्याची गरजच काय, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी हा प्रस्ताव तहकूब केला. त्यामुळे आता रात्रनिवारा केंद्राचे भवितव्य अधांतरी आले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बेघरांचा सर्व्हे केला होता. त्यात ५२ जणांचा समावेश आहे. परंतु, लोकसंख्येच्या मानाने शहरात १८ निवारा केंद्र असावेत, असे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील गांधीनगर पोखरण रोड नं. २, कोपरी येथील शाळेची धोकादायक इमारत, शिवाईनगर आणि दिवा-म्हातार्डी येथील जागा निश्चित केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, कोपरी गावातील शाळेतील निवारा केंद्राला भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी विरोध केला. या ठिकाणी जुने मंदिर आहे, येथे ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी निवारा केंद्र सुरू करू नका, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच ही शाळा निवडण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती, असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे दिवा स्टेशनपासून म्हातार्डी गाव ४ किमी अंतरावर आहे. असे असताना स्टेशन परिसर सोडून गावात निवारा केंद्र कशासाठी, असा सवाल स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. तर नौपाड्य़ात सुरू असलेल्या केंद्रावर गोरगरीब, भिकारी येत नसून त्या ठिकाणी चांगले व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. त्यातही येथील केंद्र महापालिकेने यापूर्वीच दिली होती. त्या ठिकाणी मॅटर्निटी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याने ते बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी महापालिकेच्या इतर इमारतीदेखील घोडबंदर किंवा शहरापासून दूरच्या भागात उभ्या आहेत. त्या ठिकाणी ही केंद्र हलवा, असा दमच भरला. तसेच विरोध लक्षात घेऊन महापौरांनीदेखील हा प्रस्ताव तहकूब केला.