शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रात्रनिवाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, कोपरीतीसह दिव्यातील निवारा केंद्राला स्थानिक नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत विरोध केला. स्टेशनजवळ अशा प्रकारचे निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असताना गावात किंवा स्टेशनपासून लांबच्या अंतरावर ते सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले असल्याने या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.

स्टेशन सोडून इतर ठिकाणी तुम्हाला निवारा केंद्र सुरू करण्याची गरजच काय, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी हा प्रस्ताव तहकूब केला. त्यामुळे आता रात्रनिवारा केंद्राचे भवितव्य अधांतरी आले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बेघरांचा सर्व्हे केला होता. त्यात ५२ जणांचा समावेश आहे. परंतु, लोकसंख्येच्या मानाने शहरात १८ निवारा केंद्र असावेत, असे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील गांधीनगर पोखरण रोड नं. २, कोपरी येथील शाळेची धोकादायक इमारत, शिवाईनगर आणि दिवा-म्हातार्डी येथील जागा निश्चित केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, कोपरी गावातील शाळेतील निवारा केंद्राला भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी विरोध केला. या ठिकाणी जुने मंदिर आहे, येथे ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी निवारा केंद्र सुरू करू नका, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच ही शाळा निवडण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती, असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे दिवा स्टेशनपासून म्हातार्डी गाव ४ किमी अंतरावर आहे. असे असताना स्टेशन परिसर सोडून गावात निवारा केंद्र कशासाठी, असा सवाल स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. तर नौपाड्य़ात सुरू असलेल्या केंद्रावर गोरगरीब, भिकारी येत नसून त्या ठिकाणी चांगले व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. त्यातही येथील केंद्र महापालिकेने यापूर्वीच दिली होती. त्या ठिकाणी मॅटर्निटी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याने ते बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी महापालिकेच्या इतर इमारतीदेखील घोडबंदर किंवा शहरापासून दूरच्या भागात उभ्या आहेत. त्या ठिकाणी ही केंद्र हलवा, असा दमच भरला. तसेच विरोध लक्षात घेऊन महापौरांनीदेखील हा प्रस्ताव तहकूब केला.