शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ठाण्यात रात्रनिवाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

ठाणे : शहराच्या विविध भागात असलेल्या महापालिकेच्या शाळा, इमारत तसेच भूखंडाच्या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, कोपरीतीसह दिव्यातील निवारा केंद्राला स्थानिक नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत विरोध केला. स्टेशनजवळ अशा प्रकारचे निवारा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असताना गावात किंवा स्टेशनपासून लांबच्या अंतरावर ते सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले असल्याने या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला.

स्टेशन सोडून इतर ठिकाणी तुम्हाला निवारा केंद्र सुरू करण्याची गरजच काय, असा सवाल महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी हा प्रस्ताव तहकूब केला. त्यामुळे आता रात्रनिवारा केंद्राचे भवितव्य अधांतरी आले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बेघरांचा सर्व्हे केला होता. त्यात ५२ जणांचा समावेश आहे. परंतु, लोकसंख्येच्या मानाने शहरात १८ निवारा केंद्र असावेत, असे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरातील गांधीनगर पोखरण रोड नं. २, कोपरी येथील शाळेची धोकादायक इमारत, शिवाईनगर आणि दिवा-म्हातार्डी येथील जागा निश्चित केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, कोपरी गावातील शाळेतील निवारा केंद्राला भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी विरोध केला. या ठिकाणी जुने मंदिर आहे, येथे ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांचीही ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी निवारा केंद्र सुरू करू नका, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच ही शाळा निवडण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती, असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे दिवा स्टेशनपासून म्हातार्डी गाव ४ किमी अंतरावर आहे. असे असताना स्टेशन परिसर सोडून गावात निवारा केंद्र कशासाठी, असा सवाल स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी केला. तर नौपाड्य़ात सुरू असलेल्या केंद्रावर गोरगरीब, भिकारी येत नसून त्या ठिकाणी चांगले व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. त्यातही येथील केंद्र महापालिकेने यापूर्वीच दिली होती. त्या ठिकाणी मॅटर्निटी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याने ते बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर महापौरांनी महापालिकेच्या इतर इमारतीदेखील घोडबंदर किंवा शहरापासून दूरच्या भागात उभ्या आहेत. त्या ठिकाणी ही केंद्र हलवा, असा दमच भरला. तसेच विरोध लक्षात घेऊन महापौरांनीदेखील हा प्रस्ताव तहकूब केला.