शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईच्या निषेधार्थ एमआयडीसीवर मोर्चा

By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST

येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

कल्याण: येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.२७ गावांचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तेथील स्थानिकांना भेडसावत आहे. गावे केडीएमसीत समावेश होऊनही या समस्येचे निराकरण झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी वाढवून देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता शिवसेनेच्यावतीने एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढून वाढीव पाण्याची मागणी केली. यावेळी प्रकाश म्हात्रे, जयंता पाटील, उमेश पाटील आणि सुखदेव पाटील या पदाधिका-यांसह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावे पालिकेत समावेश असली तरी केडीएमसीला कारभार सुरळीत चालविण्यासाठी थोडा अवधी हवा आहे त्यामुळे एमआयडीसीने मुबलक पाणी दयावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असून पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चोवीस तास नको निदान एक ते दोन तास तरी पुरेसा पाणीपुरवठा करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वाढीव पाणी देणे हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे सध्या वाढीव पाणी देता येणार नाही.ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर थकबाकी असून देखील त्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहीती यावेळी अधिका-यांच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)