शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

पाणी टंचाईच्या निषेधार्थ एमआयडीसीवर मोर्चा

By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST

येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

कल्याण: येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.२७ गावांचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तेथील स्थानिकांना भेडसावत आहे. गावे केडीएमसीत समावेश होऊनही या समस्येचे निराकरण झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी वाढवून देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता शिवसेनेच्यावतीने एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढून वाढीव पाण्याची मागणी केली. यावेळी प्रकाश म्हात्रे, जयंता पाटील, उमेश पाटील आणि सुखदेव पाटील या पदाधिका-यांसह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावे पालिकेत समावेश असली तरी केडीएमसीला कारभार सुरळीत चालविण्यासाठी थोडा अवधी हवा आहे त्यामुळे एमआयडीसीने मुबलक पाणी दयावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असून पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चोवीस तास नको निदान एक ते दोन तास तरी पुरेसा पाणीपुरवठा करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वाढीव पाणी देणे हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे सध्या वाढीव पाणी देता येणार नाही.ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर थकबाकी असून देखील त्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहीती यावेळी अधिका-यांच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)