शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

पाणी टंचाईच्या निषेधार्थ एमआयडीसीवर मोर्चा

By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST

येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

कल्याण: येथील २७ गावांमधील परिसरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.२७ गावांचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तेथील स्थानिकांना भेडसावत आहे. गावे केडीएमसीत समावेश होऊनही या समस्येचे निराकरण झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी वाढवून देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान ग्रामस्थांचा वाढता रोष पाहता शिवसेनेच्यावतीने एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढून वाढीव पाण्याची मागणी केली. यावेळी प्रकाश म्हात्रे, जयंता पाटील, उमेश पाटील आणि सुखदेव पाटील या पदाधिका-यांसह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावे पालिकेत समावेश असली तरी केडीएमसीला कारभार सुरळीत चालविण्यासाठी थोडा अवधी हवा आहे त्यामुळे एमआयडीसीने मुबलक पाणी दयावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोन वर्षापासून कमी दाबाने पाणी येत असून पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चोवीस तास नको निदान एक ते दोन तास तरी पुरेसा पाणीपुरवठा करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वाढीव पाणी देणे हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे सध्या वाढीव पाणी देता येणार नाही.ग्रामस्थांची मोठया प्रमाणावर थकबाकी असून देखील त्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहीती यावेळी अधिका-यांच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)