शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 18, 2014 23:11 IST

पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जव्हार येथील सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही कार्यालय हलविणार नाही.

जव्हार : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जव्हार येथील सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही कार्यालय हलविणार नाही. त्याचप्रमाणे आदिवासी अप्पर आयुक्त व जिल्हा रुग्णालय जव्हार येथे निर्माण करण्याचे आश्वासन आदिवासींना दिले होते. मात्र, ते न पाळता हळुहळू करून एकेक कार्यालये स्थलांतरीत होऊ लागली. त्यात पालघर येथे जिल्हा रुग्णालयासाठी फडणवीस सरकारने देखील विरोध न केल्याने आदिवासी तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही आदिवासी नागरीक हा मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय पालघर येथे होणार म्हणून कष्टकरी संघटनेने याचा तीव्र निषेध करून जव्हार अप्पर जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन दिले.जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके कुपोषण व त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चर्चेत आहेत. अतिदुर्गम असलेला हा भाग आदिवासी बहुल असून डोंगरदऱ्यात छोट्या छोट्या पाड्यांत वसलेला आहे. शासनाच्या ३०,००० लोकसंख्येला एक प्राथ. आरोग्य केंद्र या निकषामुळे आजही येथील रुग्णांना दळणवळणाच्या अभावी डोली करून प्रा. आ. केंद्रात आणले जाते. तेथे तज्ञ डॉक्टर नसल्याने ग्रामीण रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. ग्रामीण रूग्णालयात खाटा उपलब्ध नसणे, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने व उपलब्ध डॉक्टरांना इलाज करण्यासाठी वैद्यकीय उपचार साधनेच नसल्याने नाईजालाने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. सर्वच आदिवासी बहुल तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालय हे ठाणे अथवा नाशिक येथेच आहे. त्याठीकाणचे अंतर ७० ते १०० कि. मी. इतके आहे. अत्यावस्थ रुग्ण, गर्भवती, कुपोषीत बालके यांना या पायाभूत सुविधा मिळण्यासाठी पाड्यापासून जिल्ह्यापर्यंतचा सर्वसाधारण १५० कि. मी. करावा लागणारा खडतर प्रवास ही गोष्ट नक्कीच लाजीरवाणी आहे. जर प्रशासकीय व राजकीय फायद्यासाठी पालघर येथे जिल्हा रुग्णालय निर्माण केले तर ते ठाणे अथवा नाशिक पेक्षाही त्रासदायक व क्लीष्ट होणार आहे. या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या नेत्या सिराज बलसारा, न्रायन लोबो, अ‍ॅड. रामराव मुकणे यांनी केले. (वार्ताहर)