शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 18, 2014 23:11 IST

पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जव्हार येथील सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही कार्यालय हलविणार नाही.

जव्हार : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जव्हार येथील सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही कार्यालय हलविणार नाही. त्याचप्रमाणे आदिवासी अप्पर आयुक्त व जिल्हा रुग्णालय जव्हार येथे निर्माण करण्याचे आश्वासन आदिवासींना दिले होते. मात्र, ते न पाळता हळुहळू करून एकेक कार्यालये स्थलांतरीत होऊ लागली. त्यात पालघर येथे जिल्हा रुग्णालयासाठी फडणवीस सरकारने देखील विरोध न केल्याने आदिवासी तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही आदिवासी नागरीक हा मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय पालघर येथे होणार म्हणून कष्टकरी संघटनेने याचा तीव्र निषेध करून जव्हार अप्पर जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन दिले.जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके कुपोषण व त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चर्चेत आहेत. अतिदुर्गम असलेला हा भाग आदिवासी बहुल असून डोंगरदऱ्यात छोट्या छोट्या पाड्यांत वसलेला आहे. शासनाच्या ३०,००० लोकसंख्येला एक प्राथ. आरोग्य केंद्र या निकषामुळे आजही येथील रुग्णांना दळणवळणाच्या अभावी डोली करून प्रा. आ. केंद्रात आणले जाते. तेथे तज्ञ डॉक्टर नसल्याने ग्रामीण रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. ग्रामीण रूग्णालयात खाटा उपलब्ध नसणे, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने व उपलब्ध डॉक्टरांना इलाज करण्यासाठी वैद्यकीय उपचार साधनेच नसल्याने नाईजालाने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. सर्वच आदिवासी बहुल तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालय हे ठाणे अथवा नाशिक येथेच आहे. त्याठीकाणचे अंतर ७० ते १०० कि. मी. इतके आहे. अत्यावस्थ रुग्ण, गर्भवती, कुपोषीत बालके यांना या पायाभूत सुविधा मिळण्यासाठी पाड्यापासून जिल्ह्यापर्यंतचा सर्वसाधारण १५० कि. मी. करावा लागणारा खडतर प्रवास ही गोष्ट नक्कीच लाजीरवाणी आहे. जर प्रशासकीय व राजकीय फायद्यासाठी पालघर येथे जिल्हा रुग्णालय निर्माण केले तर ते ठाणे अथवा नाशिक पेक्षाही त्रासदायक व क्लीष्ट होणार आहे. या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या नेत्या सिराज बलसारा, न्रायन लोबो, अ‍ॅड. रामराव मुकणे यांनी केले. (वार्ताहर)