शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

किल्ला, कोर्ट, हाय-वे दर्जेदार!

By admin | Updated: December 7, 2015 01:01 IST

मला खूप आनंद होत आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत. पूर्वी इतक्या चांगल्या फिल्म बनत नसत

ठाणे : मला खूप आनंद होत आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत. पूर्वी इतक्या चांगल्या फिल्म बनत नसत. किल्ला, कोर्ट, हाय वे हे तीन चित्रपट अतिशय वेगळे, चांगले व दर्जेदार आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की, मराठी सिनेनिर्मात्यांनी मराठीतच चित्रपट बनवावेत. हिंदीमध्ये बनविण्याचा प्रयत्नही करू नये, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ठाण्यात कार्यक्रमप्रसंगी बोलताना दिला. कोर्ट, किल्ला, हाय वे, दम लगा के हैय्या अशा चित्रपटांची आज गरज आहे. हे चित्रपट केवळ चांगलेच नव्हे तर यशस्वी पण होत आहेत, अशा भावनाही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केल्या. इंद्रधनूच्या वतीने श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सवात शनिवारी नसीरुद्दीन यांची मुलाखत झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स आले. कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की, ज्यामुळे माझे स्ट्रगल संपले आणि चांगले दिवस सुरू झाले. चांगले दिवस आले, पण तेही हळूहळू. स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. हे सांगताना त्यांनी विजयाबार्इंची एक आठवण सांगत त्यांच्यासोबत थिएटरमध्ये काम करायला न मिळाल्याची खंत व्यक्त केली. मी खूप वाईट चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. परंतु, याबाबत मला कोणताही पश्चात्ताप होत नसून उलट यातून काही ना काही शिकायला मिळाले. निरीक्षण, कल्पनाशक्ती याबरोबर दुसऱ्याच्या दु:खाची जाणीवदेखील अभिनेत्याला असली पाहिजे. शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, चित्रपट बनविणे खूप कठीण आहे आणि त्याहून कठीण वाईट चित्रपट बनविणे आहे. वाईट चित्रपट बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. विजय केंकरे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून नसीरुद्दीन यांना त्यांनी बोलते केले.