शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

किल्ला, कोर्ट, हाय-वे दर्जेदार!

By admin | Updated: December 7, 2015 01:01 IST

मला खूप आनंद होत आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत. पूर्वी इतक्या चांगल्या फिल्म बनत नसत

ठाणे : मला खूप आनंद होत आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत. पूर्वी इतक्या चांगल्या फिल्म बनत नसत. किल्ला, कोर्ट, हाय वे हे तीन चित्रपट अतिशय वेगळे, चांगले व दर्जेदार आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की, मराठी सिनेनिर्मात्यांनी मराठीतच चित्रपट बनवावेत. हिंदीमध्ये बनविण्याचा प्रयत्नही करू नये, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ठाण्यात कार्यक्रमप्रसंगी बोलताना दिला. कोर्ट, किल्ला, हाय वे, दम लगा के हैय्या अशा चित्रपटांची आज गरज आहे. हे चित्रपट केवळ चांगलेच नव्हे तर यशस्वी पण होत आहेत, अशा भावनाही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केल्या. इंद्रधनूच्या वतीने श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सवात शनिवारी नसीरुद्दीन यांची मुलाखत झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स आले. कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की, ज्यामुळे माझे स्ट्रगल संपले आणि चांगले दिवस सुरू झाले. चांगले दिवस आले, पण तेही हळूहळू. स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. हे सांगताना त्यांनी विजयाबार्इंची एक आठवण सांगत त्यांच्यासोबत थिएटरमध्ये काम करायला न मिळाल्याची खंत व्यक्त केली. मी खूप वाईट चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. परंतु, याबाबत मला कोणताही पश्चात्ताप होत नसून उलट यातून काही ना काही शिकायला मिळाले. निरीक्षण, कल्पनाशक्ती याबरोबर दुसऱ्याच्या दु:खाची जाणीवदेखील अभिनेत्याला असली पाहिजे. शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, चित्रपट बनविणे खूप कठीण आहे आणि त्याहून कठीण वाईट चित्रपट बनविणे आहे. वाईट चित्रपट बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. विजय केंकरे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून नसीरुद्दीन यांना त्यांनी बोलते केले.