शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सत्तेसाठी मुंडेंच्या संघर्षाचा विसर

By admin | Updated: August 20, 2016 04:45 IST

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते

ठाणे : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते पप्पू कालानी हे त्यांच्या रडारवर होते. सध्या पप्पू हे तुरुंगात असून त्यांचे पुत्र ओमी यांच्याकरिता लाल गालिचे अंथरण्याची लगबग ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी सुरू केली आहे. सत्तापिपासू भाजपाला मुंडे यांच्या संघर्षाचा अल्पावधीत विसर पडल्याबद्दल त्यांचे समर्थक तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत.पप्पू कालानी हे पवारसमर्थक म्हणून ओळखले जात. उल्हासनगरच्या रक्तरंजीत राजकारणाचा मुद्दा मुंडे यांनी उचलला होता. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंडे यांच्या संघर्षाला साथ देत ‘कालानी यांना तुरुंगात मारहाण करु नका,’ असे आदेश पवार यांनी दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंडेंच्या संघर्षामुळे १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तारूढ झाले. इंदर भतिजा हत्याकांडात पप्पू सध्या तुरुंगात आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यशैली अमलात आणली आहे. ज्या शहरात पक्ष कमकुवत असेल तेथील मातब्बर नेत्याला पक्षात घेऊन तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा मिळवण्याची ही रणनीती आहे. मातब्बर नेत्याला पक्षप्रवेश देताना त्याच्या भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे कानाडोळा करून ‘बेरजेचे राजकारण’ या गोंडस नावाखाली त्या नेत्याला पावन केले जाते. राष्ट्रवादीकडे गृहखाते असल्याने अनेक माफिया सत्तेच्या काळात त्या पक्षाच्या वळचणीला गेले होते. सत्ताबदल होताच त्यांना भाजपाची आस लागली असून त्याचे कारण गृहखाते हेच आहे. राष्ट्रवादीने दिवंगत आर. आर. पाटील यांचा सोज्वळ चेहरा गृहखात्याला दिला होता. सध्या गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून तेही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेकरिता सुपरिचीत आहेत. (संबंधित वृत्त पान ४) सत्तापिपासू झाल्याने अटलबंधनाची घाईकालानी भाजपात डेरेदाखल व्हावे याकरिता राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश शुक्रमणी यांचा भाचा गुड्डु शुक्रमणी यांना ओमी कालानी यांनी यापूर्वी मारहाण केली होती व त्याकरिता ते तरुंगात होते. त्यावेळी कालानी यांच्या अटकेकरिता भाजपा-शिवसेना या मित्रपक्षांनी संयुक्त मोर्चे काढले होते. मात्र आता उल्हासनगरमधील येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सद्दी संपवणे हा एकमेव हेतू असल्याने कालानी यांना ‘अटलबंधन’ बांधण्याची घाई सुरु झाली असल्याने मुंडे यांनी केलेल्या संघर्षावर बोळा फिरवला जाणार आहे, असे मुंडे समर्थकांचे मत आहे.