शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सत्तेसाठी मुंडेंच्या संघर्षाचा विसर

By admin | Updated: August 20, 2016 04:45 IST

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते

ठाणे : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एल्गार पुकारून शरद पवार यांना लक्ष्य केले होते तेव्हा उल्हासनगरचे वादग्रस्त नेते पप्पू कालानी हे त्यांच्या रडारवर होते. सध्या पप्पू हे तुरुंगात असून त्यांचे पुत्र ओमी यांच्याकरिता लाल गालिचे अंथरण्याची लगबग ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी सुरू केली आहे. सत्तापिपासू भाजपाला मुंडे यांच्या संघर्षाचा अल्पावधीत विसर पडल्याबद्दल त्यांचे समर्थक तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत.पप्पू कालानी हे पवारसमर्थक म्हणून ओळखले जात. उल्हासनगरच्या रक्तरंजीत राजकारणाचा मुद्दा मुंडे यांनी उचलला होता. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंडे यांच्या संघर्षाला साथ देत ‘कालानी यांना तुरुंगात मारहाण करु नका,’ असे आदेश पवार यांनी दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंडेंच्या संघर्षामुळे १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तारूढ झाले. इंदर भतिजा हत्याकांडात पप्पू सध्या तुरुंगात आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यशैली अमलात आणली आहे. ज्या शहरात पक्ष कमकुवत असेल तेथील मातब्बर नेत्याला पक्षात घेऊन तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेवर कब्जा मिळवण्याची ही रणनीती आहे. मातब्बर नेत्याला पक्षप्रवेश देताना त्याच्या भ्रष्ट, गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे कानाडोळा करून ‘बेरजेचे राजकारण’ या गोंडस नावाखाली त्या नेत्याला पावन केले जाते. राष्ट्रवादीकडे गृहखाते असल्याने अनेक माफिया सत्तेच्या काळात त्या पक्षाच्या वळचणीला गेले होते. सत्ताबदल होताच त्यांना भाजपाची आस लागली असून त्याचे कारण गृहखाते हेच आहे. राष्ट्रवादीने दिवंगत आर. आर. पाटील यांचा सोज्वळ चेहरा गृहखात्याला दिला होता. सध्या गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून तेही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेकरिता सुपरिचीत आहेत. (संबंधित वृत्त पान ४) सत्तापिपासू झाल्याने अटलबंधनाची घाईकालानी भाजपात डेरेदाखल व्हावे याकरिता राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश शुक्रमणी यांचा भाचा गुड्डु शुक्रमणी यांना ओमी कालानी यांनी यापूर्वी मारहाण केली होती व त्याकरिता ते तरुंगात होते. त्यावेळी कालानी यांच्या अटकेकरिता भाजपा-शिवसेना या मित्रपक्षांनी संयुक्त मोर्चे काढले होते. मात्र आता उल्हासनगरमधील येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सद्दी संपवणे हा एकमेव हेतू असल्याने कालानी यांना ‘अटलबंधन’ बांधण्याची घाई सुरु झाली असल्याने मुंडे यांनी केलेल्या संघर्षावर बोळा फिरवला जाणार आहे, असे मुंडे समर्थकांचे मत आहे.