शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

परप्रांतीय नागरिक पुुन्हा ठाण्यात परतू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून परप्रांतीय नागरिकांनी घरची वाट धरली होती; ...

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून परप्रांतीय नागरिकांनी घरची वाट धरली होती; परंतु आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने हे नागरिक पुन्हा कामासाठी ठाण्याच्या दिशेने येऊ लागले आहेत. त्यानुसार मागील आठवडाभरात ठाणे स्थानकात पाच हजार ७३५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यातील ५७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघड झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत घेतलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातची कामे गेली होती. काहींना आपल्या गावीही जाता आले नव्हते. त्यानंतर अनलॉकमध्ये गावी जाण्यासाठी ठाण्यासह इतर स्थानकांमध्ये परप्रांतीयांचे लोंढे वाढले होते. कोरोनाची पहिली लाट ओसरताच गावी गेलेले परप्रांतीय कामानिमित्ताने पुन्हा मुंबई, ठाण्याच्या दिशेने परतू लागले. काही महिने हाताला काम मिळते ना मिळते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊन आपले हाल होतील या भीतीने आधीच परप्रांतीयांनी पुन्हा गावची वाट धरली; परंतु आता कोरोनाची दुसरी लाटही काही प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यामुळे आता परप्रांतीयांचे लोंढे मुंबई, ठाण्याच्या दिशेने येऊ लागले आहेत; परंतु कोरोना चाचणीपासून लपण्यासाठी अनेकांनी ठाणे स्टेशन किंवा इतर ठिकाणांहून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच मागील काही दिवसांत परप्रांतीय येण्याची संख्या वाढू लागल्याने ठाणे महापालिकेने पुन्हा स्टेशन परिसरात अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशा नागरिकांना हेरून त्यांची चाचणी ठामपाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात चाचणी करून घेण्यासाठी काही दिवसांपासून रांगा वाढल्याचे चित्र दिसत आहे.

‘चाचणी करूनच शहरात प्रवेश करा’

- ठामपाने ३० ऑगस्ट २०२० पासून रेल्वेस्थानक परिसरात अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३० ऑगस्ट २०२० ते २६ मे २०२१ पर्यंत रेल्वेने आलेल्या एक लाख ९१ हजार ४१२ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील तीन हजार ४२५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

- तर, २० मे ते २६ मे दरम्यान ठामपाच्या माध्यमातून स्टेशन परिसरात पाच हजार ७३५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ५७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी आधी कोरोना चाचणी करावी, मगच ठाण्यात प्रवेश करावा, असे आवाहन आता ठामपाने केले आहे.

-------------