शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अन्न, औषध प्रशासन विभागाकडून वर्षभरात १९९ प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 23, 2017 01:40 IST

मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्या निकाली काढताना, सरकारी तिजोरीत ४५ लाख ६५ हजार रुपये रक्कम दंड म्हणून जमा झाली आहे. त्यातच २६४ तक्रारी न्यायालयात दाखल असून त्यावर तारीख- पे-तारीख पडत असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली.अस्वच्छतेचे वातावरण, कमी प्रतीचा माल अशा आलेल्या २५७ आणि मागील प्रलंबित ४९६ अशा ७५३ तक्रारींपैकी १९९ तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी मार्गी लावले आहेत. ते मार्गी लावताना दंड आकारला जात आहे. अशा प्रकारे निकाली काढलेल्या तक्रारीपोटी ४५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षातील तक्रारी असून त्यामध्ये आॅगस्ट २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी निकाली काढताना ८ लाख ७० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. मे आणि डिसेंबर २०१६ हे दोन महिने सोडले, तर इतर महिन्यात लाखोंची दंडात्मक कारवाई केली. तर, ५५४ प्रकरणे प्रलंबित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याचदरम्यान, त्या वर्षात एफडीएने कोकण विभागात ४ हजार ७७९ ठिकाणी तपासणी करून १ हजार १११ ठिकाणी सुधारणा करता येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सुधारणा नोटिसा दिल्या होत्या. त्यातील १४० दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, तपासणीत ५०१ प्रकरणांत १४ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्याचे सूत्रांनी सांगितले.