शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

शेतात पाणी आणण्यासाठी चाऱ्यांना ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा स्वखर्चाने मुलामा देऊन पाणी शेतात घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यातील भातसा धरणातून शहापूर, भिवंडी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उन्हाळ्यात पाणी दिले जाते. मात्र आज शहापूर तालुक्यातील शेकडो एकर शेती ही पाण्याविना ओसाड पडली असून या शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या चाऱ्या या निकामी झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जात नसून ते जमिनीतच मुरते किंवा त्या तुटलेल्या चाऱ्यामधून इतरत्र निघून जाते. जागेवरच पाणी साठत असल्याने शेकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळतच नसल्याने दुबार शेतीचे प्रमाण कमी होत आहे.

आपल्या शेतापर्यंत पाणी येण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता स्वखर्चाने त्यावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून आपल्या शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न दहागाव येथील शेतकरी करीत असून तालुक्यात कालव्याच्या जवळ असणाऱ्या व सिंचनाखाली असलेल्या शेतीसाठी हे केविलवाणा प्रयत्न केले जात आहेत. या मोडकळीस असलेल्या चाऱ्यांची डागडुजी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

फोटो ओळ : दहागाव येथे चाऱ्यावर अशी ताडपत्री टाकून शेतीसाठी पाणी घेण्यात येत आहे.