शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

पूरग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ...

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात उल्हास नदीकिनारी असलेल्या नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना अजूनही मदत न मिळाल्यानं नागरिकांनी लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली आहे.

बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यानंतर पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले होते. मात्र अद्यापही या नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पुराचे पाणी बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील नागरी वसाहतीत शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन दोन महिने झाल्यानंतर अद्यापही नागरिकांना भरपाई मिळाली नाही. याबाबत नायब तहसीलदार संभाजी पवार यांना विचारणा केली असता, शासनाकडून ७६ लाख रुपये मंजूर झाले असून सध्या पूरग्रस्तांच्या याद्यांची दुरुस्ती सुरु आहे. येत्या काही दिवसांत पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संभाजी पवार यांनी दिली आहे.

-----