शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

पूरनियंत्रण रेषेमुळे बांधकाम व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

बदलापूर : जलसंपदा विभागाने बदलापुरात उल्हास नदीची पूरनियंत्रण रेषा अंतिम केल्यानंतर या पूररेषेत येणारी बांधकामे बाधित झाली आहेत. ...

बदलापूर : जलसंपदा विभागाने बदलापुरात उल्हास नदीची पूरनियंत्रण रेषा अंतिम केल्यानंतर या पूररेषेत येणारी बांधकामे बाधित झाली आहेत. नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार या भागात जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास परवानगी दिली जाणार असली तरी त्यासाठीही अनेक अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याने यातून तोडगा काढण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आमदार किसन कथोरे यांना साकडे घातले आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात आमदार कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बिल्डर्स असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांनी पूरनियंत्रण रेषेमुळे कसा फटका बसणार आहे, हे सांगून यासाठी सरकार दरबारी दिलासा मिळावा, अशी विनंती कथोरे यांना केली. असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी ज्या सर्वेक्षणाच्या आधारे जलसंपदा विभागाने पूररेषा अंतिम केली आहे त्या सर्वेक्षणालाच आमची हरकत असल्याचे सांगितले. तसेच पूरनियंत्रण रेषा अंतिम करताना आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच मिळाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर कथोरे यांनी बदलापूरला उल्हास नदीवरील वालीवली पुलामुळे पुराचा फटका बसत असल्याचे सांगितले. त्यासाठी हा पूल तोडून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले. एमआयडीसीमार्फत साडेतीन कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येणार असून या कामाला तांत्रिक मंजुरीही मिळाली असल्याचे ते म्हणाले. या पुलाचे काम झाल्यास बदलापूरला पुरापासून दिलासा मिळू शकेल, असा दावाही त्यांनी केला. त्याचप्रमाणे बारवी डॅमची उंची वाढविण्यात आल्यामुळे आता तो पावसाळ्याच्या अखेरीस ओव्हरफ्लो होतो, त्यामुळे त्या पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही. ही वस्तुस्थिती सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीला माहीत नसते. अधिकाऱ्यांनाही ते सांगता येणार नाही. स्थानिक नागरिकच ते सांगू शकतात. त्यामुळे हे सर्व मुद्दे आपण सभागृहात दिलेल्या निवेदनात नमूद केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात स्थगिती हा उपाय नसून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, मुख्य सचिव, राज्याचे जलसंपदामंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडे टप्प्याटप्प्याने बैठका घेेऊन यातून मार्ग काढू, असे आश्वासन कथोरे यांनी दिले.