शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अवघ्या चार दिवसात पाच हजार ९३० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST

ठाणे : मागील महिनाभरापासून कोरोनाचा कहर ठाण्यात सुरूच आहे. आजघडीला दिवसाला दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ...

ठाणे : मागील महिनाभरापासून कोरोनाचा कहर ठाण्यात सुरूच आहे. आजघडीला दिवसाला दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मागील चार दिवसांत कोरोनाचे नवे पाच हजार ९३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबर ठाणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा पुन्हा ५० दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्यांवरून ८४ टक्यांच्या आसपास आले आहे. मागील काही दिवसांत मृत्यूदेखील वाढताना दिसत आहेत. एकूणच ठाण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम झाला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत मागील फेब्रुवारी मध्यापर्यंत कोरोना आटोक्यात असल्याचे दिसत होते. परंतु, फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने ठाणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यानुसार मार्चच्या एका महिन्यात शहरात १४ हजार ७४७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. परंतु, आता हा वेग पाच पटीने वाढल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत कोरोनाचे तब्बल पाच हजार ९३० नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ८३ हजार ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ७० हजार ६१८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर शहरात आतापर्यंत एक हजार ४६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६.४ टक्के एवढे होते. ते आता ८५ टक्क्यांवर आले आहे. सध्याच्या घडीला ११ हजार ८०३ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. मागील महिन्यात हेच प्रमाण एक हजार ७०० च्या आसपास होते. त्यातही आता वाढ होताना दिसत आहे.

- आठ हजार ९७९ रुग्ण हे घरीच विलगीकरणात

सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार घरातील एकाला बाधा झाली तर इतरांना बाधा होत आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे सध्याच्या घडीला एकूण प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आठ हजार ९७९ रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. तर दोन हजार ४८१ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील नऊ हजार ३६६ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तर एक हजार ९९२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. याशिवाय ४४५ रुग्ण हे क्रिटिकल असून ४४५ रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. तर ४४ जणांना व्हेंटिलेटर लावले आहे. दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा महिनाभरापूर्वी साधारणपणो ७ मार्च रोजी २५४ दिवसांवर होता. त्यानंतर तो १८३ दिवसांवर आला होता. आता हाच दर ५० दिवसांवर आला आहे.