शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST

किन्हवली : शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात चार दिवस मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे साेमवारी पुन्हा ...

किन्हवली : शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात चार दिवस मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे साेमवारी पुन्हा धरणाचे पाचही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. गेटमधून १८ हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्त्वाचे समजले जाणारे भातसा धरण पूर्णपणे भरलेले आहे. आतापर्यंत चौथ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाची क्षमता १४१ मीटर एवढी आहे. सध्या ही पातळी १४१.७० मीटर इतकी झाली आहे. भातसा धरण ९९.०६ टक्के भरले असून आज १०४.०० मि.मी. पाउस झाला असून १३ सप्टेंबरला सकाळी भातसा धरणाचे पाच दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भातसा नदीलगतच्या गावांना तसेच शहापूर मुरबाड रस्त्यालगत सापगाव नदी पुलावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा जलसंपदा खात्याकडून देण्यात आला आहे.

यासंबंधी तातडीचे परिपत्रक उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग भातसा नगर यांनी काढले आहे. धरणाच्या पाण्याचाही समावेश झाल्याने भातसा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता ओळखून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील सापगाव पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने शहापूर-मुरबाड या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काेट

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे पाच गेट एका मीटरने उघडण्यात आले असून भातसा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा तथा पाटबंधारे विभाग, भातसा