शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

प्रथमच साडेअकरा हजार हेक्टरवर तुरीचा पेरा; समाधानकारक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:25 IST

भातपिकासह कडधान्यलागवड पूर्ण, बांधावरच उपलब्ध करुन दिले बियाणे

ठाणे : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ९९.१० टक्के पाऊस झाला आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला असून खरीप हंगामातील भातासह तृण व कडधान्य पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. यामध्ये तुरीचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांधावर शेतकऱ्यांना तिचे बियाणे उपलब्ध करून दिल्याने ११ हजार ५५० हेक्टरवर तिची लागवड झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.

यंदा पावसाने जून महिन्यात कमी प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, जुलै व आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावून गेला. जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेण्यात येत असते. त्याच्या सरासरी ५४ हजार ९५१.३८ हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हजार ५८५ (९९.३३ %) हेक्टरवर लागवड झाली आहे.इतर तृणधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५८३.४४ हेक्टर असून एक हजार ७०३ हेक्टरवर लागवड झाली. कडधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र एक हजार २५२.४९ हेक्टर आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५९८९९.५४ हेक्टर असले, तरी यंदा त्यात वाढ होऊन शेतकºयांनी ६०९०९ हेक्टरवर लागवड केली आहे. यात विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कडधान्य पिकांतर्गत तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करून त्यासाठी शेतकºयांना ४१.३७ क्विंटल बियाणे बांधावर उपलब्ध करून दिल्यामुळे ११,५५० हेक्टर क्षेत्रावर तिची लागवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. दरम्यान, खरीप हंगामात उत्तम व दर्जेदार पिके घेता यावी, याकरिता जिल्हा कृषी विभागाच्या वतीने पीक प्रात्यक्षिके सादर केली.

टॅग्स :thaneठाणे