शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लसीबाबत भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भिवंडी ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संकट कमी व्हावे म्हणून लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात आजही शंका असल्याने ते लसीकरणापासून दूर राहणे पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जसे लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तसे न करता केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत.

भिवंडीतील अनेक आदिवासी पाडे व पाच्छापूर, गाणे , फिरिंगपाडा , लाखीवली अशा दुर्गम भागातील नागरिकांना तर लसींबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणाही अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाड्यांवर व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकारणापासून वंचित आहेत. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया चिराडपाडा येथील रहिवासी प्रकाश कुंडलिक वाघे या तरुणाने दिली आहे.

कोरोना लस १८ वर्षांपासून पुढे सर्वांना देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना अनेक वेळा लस दिली जात नसल्याने तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णासंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राहुल हरिभाऊ ढमने या तरुणाने दिली आहे.