शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात लसीबाबत भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भिवंडी ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संकट कमी व्हावे म्हणून लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात आजही शंका असल्याने ते लसीकरणापासून दूर राहणे पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जसे लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तसे न करता केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत.

भिवंडीतील अनेक आदिवासी पाडे व पाच्छापूर, गाणे , फिरिंगपाडा , लाखीवली अशा दुर्गम भागातील नागरिकांना तर लसींबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणाही अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाड्यांवर व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकारणापासून वंचित आहेत. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया चिराडपाडा येथील रहिवासी प्रकाश कुंडलिक वाघे या तरुणाने दिली आहे.

कोरोना लस १८ वर्षांपासून पुढे सर्वांना देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना अनेक वेळा लस दिली जात नसल्याने तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णासंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राहुल हरिभाऊ ढमने या तरुणाने दिली आहे.