शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

ग्रामीण भागात लसीबाबत भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भिवंडी ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संकट कमी व्हावे म्हणून लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात आजही शंका असल्याने ते लसीकरणापासून दूर राहणे पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जसे लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तसे न करता केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत.

भिवंडीतील अनेक आदिवासी पाडे व पाच्छापूर, गाणे , फिरिंगपाडा , लाखीवली अशा दुर्गम भागातील नागरिकांना तर लसींबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणाही अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाड्यांवर व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकारणापासून वंचित आहेत. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया चिराडपाडा येथील रहिवासी प्रकाश कुंडलिक वाघे या तरुणाने दिली आहे.

कोरोना लस १८ वर्षांपासून पुढे सर्वांना देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना अनेक वेळा लस दिली जात नसल्याने तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णासंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राहुल हरिभाऊ ढमने या तरुणाने दिली आहे.