शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची भीती; ९९ लाखांपैकी फक्त आठ टक्के दुसऱ्या डोसचे लाभार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा कहर जीवघेणा ठरतो की काय, या भीतीने जिल्ह्यातील ९९ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा कहर जीवघेणा ठरतो की काय, या भीतीने जिल्ह्यातील ९९ लाख ४२ हजार ४०७ नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. जिल्हाभरात यापैकी केवळ २२ लाख ८४ हजार २६६ जणांचे लसीकरण झाले आहे. यातही या संसर्गाची फारसी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे बोलणारे अवघे आठ टक्के नागरिक या दुसऱ्या डोसचे लाभार्थी आहेत. यामुळे दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली तिसऱ्या लाटेचा कहर थरकाप उडवणारा ठरू शकतो, अशा चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.

ठाणे जिल्हा मुंबई या जागतिक महानगराला लागून असल्याने या महामारीच्या काळात अधिक सावधानतेने वावरावे लागत आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी आदी २६८ रुग्णालयांकडून आतापर्यंत अवघे २२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्येही बुडत्याला काठीचा आधार असलेल्या पहिल्या डोसचे केवळ २३ टक्के म्हणजे १६ लाख ८३ हजार ७४२ जणांचे लसीकरण शक्य झाले आहे. तर निर्बंधांचे पालन करूनही जीव धोक्यात असल्याची जाणीव ठेवून वावरणाऱ्या दुसऱ्या डोसचे फक्ते आठ टक्के म्हणजे सहा लाख ५२४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत २६८ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक कोविशिल्डच्या लसचा गवगवा आहे. याखालोखाल कोव्हॅक्सिन आणि अत्यल्प स्पुतनिकची लस घेण्याकडे लाभार्थ्यांचा कल आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. या डोसच्या अवघ्या आठ टक्के लाभार्थ्यांचा विचार करता त्यात झपाट्याने वाढ होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही सध्याचा पाऊस नैसर्गिक आपत्तीला कवटाळून धोधो पडत आहे. लसीकरण केंद्रांच्या परिसरात तलाव साचत आहेत. त्यात जीव मुठीत घेऊन रांगेत उभ्या असणाऱ्यांना इंजेक्शन मिळेपर्यंत या कोरोना प्रतिबंधात्मक डोसची खात्री होत नसल्याचे अनुभव नकोसे झाल्याचे ऐकायला मिळत आहे.

-------