शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शहापूर तालुक्यात प्रथमच केली आल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:07 IST

३० गुंठा जागेत लागवड

शेणवा : शहापूर तालुक्यातील मळेगाव  येथील शेतकरी राजेश शिर्के यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय खताच्या जोरावर ३० गुंठा जागेत आल्याची लागवड केली आहे. तालुक्यात पहिलीच आल्याची लागवड असून, सात क्विंटल बियाणे लागले. लागवडीसाठी दोन लाख खर्च आला असून, २५० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळणार आहे.शेती व्यवसाय हा तोट्याचा असा गैरसमज असल्याने शेतीत करिअर करण्यास नवीन शेतकऱ्यांची पिढीही तयार नसून, शेती करून कुणाचे भले झाले आहे?, अशी समाजात चर्चा असताना व शेती क्षेत्र संकटात असतानाही, मळेगाव येथील राजेश या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सांभाळून कृषी अधिकारी विलास झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ३० गुंठे असलेल्या शेतात व्यावसायिक शेतीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून एप्रिल-मे महिन्यात आल्याची लागवड केली. आठ ते नऊ महिन्यांत पीक भरघोस आले. हे पीक नाशवंत नसल्याने बाजारभाव आल्यावरच पीक काढून बाजारपेठेऐवजी जागेवरच आल्याची विक्री करण्याचा राजेश यांचा मानस आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला ठेवून उरलेल्या रकमेतून पुढीलवर्षी यावर्षीच्या लागवडीत आणखी सुधारणा करून गुणवत्तापूर्वक आल्याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे. हा प्रयोग उन्नतीचा राजमार्ग ठरणारयावर्षीच्या लागवडीच्या उत्पादनातीलच बी-बियाणे शिल्लक ठेवून याचीच  पुढीलवर्षी लागवड करणार व लागवड खर्च, मजुरी, वीजदर व लागणाऱ्या खताचे खर्च लक्षात घेऊन पुढील आराखडा आखणार असल्याचे शिर्के म्हणाले. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा राजमार्ग ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.लहरी हवामानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकरी विविध प्रयोग करत असून त्यांना यश मिळत आहे. हेच प्रयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असल्याने कुणीही जमीन विकू नये असे सातत्याने आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.