शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शहापूर तालुक्यात प्रथमच केली आल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:07 IST

३० गुंठा जागेत लागवड

शेणवा : शहापूर तालुक्यातील मळेगाव  येथील शेतकरी राजेश शिर्के यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय खताच्या जोरावर ३० गुंठा जागेत आल्याची लागवड केली आहे. तालुक्यात पहिलीच आल्याची लागवड असून, सात क्विंटल बियाणे लागले. लागवडीसाठी दोन लाख खर्च आला असून, २५० क्विंटल आल्याचे उत्पादन मिळणार आहे.शेती व्यवसाय हा तोट्याचा असा गैरसमज असल्याने शेतीत करिअर करण्यास नवीन शेतकऱ्यांची पिढीही तयार नसून, शेती करून कुणाचे भले झाले आहे?, अशी समाजात चर्चा असताना व शेती क्षेत्र संकटात असतानाही, मळेगाव येथील राजेश या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सांभाळून कृषी अधिकारी विलास झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ३० गुंठे असलेल्या शेतात व्यावसायिक शेतीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून एप्रिल-मे महिन्यात आल्याची लागवड केली. आठ ते नऊ महिन्यांत पीक भरघोस आले. हे पीक नाशवंत नसल्याने बाजारभाव आल्यावरच पीक काढून बाजारपेठेऐवजी जागेवरच आल्याची विक्री करण्याचा राजेश यांचा मानस आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला ठेवून उरलेल्या रकमेतून पुढीलवर्षी यावर्षीच्या लागवडीत आणखी सुधारणा करून गुणवत्तापूर्वक आल्याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे. हा प्रयोग उन्नतीचा राजमार्ग ठरणारयावर्षीच्या लागवडीच्या उत्पादनातीलच बी-बियाणे शिल्लक ठेवून याचीच  पुढीलवर्षी लागवड करणार व लागवड खर्च, मजुरी, वीजदर व लागणाऱ्या खताचे खर्च लक्षात घेऊन पुढील आराखडा आखणार असल्याचे शिर्के म्हणाले. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा राजमार्ग ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.लहरी हवामानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकरी विविध प्रयोग करत असून त्यांना यश मिळत आहे. हेच प्रयोग शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असल्याने कुणीही जमीन विकू नये असे सातत्याने आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.