शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

ठाण्याला अतिरिक्त पाणी

By admin | Updated: October 14, 2016 06:35 IST

भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला

ठाणे : भातसा आणि बारवी धरणांतूनही येत्या काळात अतिरिक्त २०० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात भातसा धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्याचा प्रस्ताव येत्या २० आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. बारवीच्या पाण्यासंदर्भातील महत्त्वाचा करार एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाशी लवकरच करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. बारवी धरणाची उंची वाढल्याने त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या महापालिकांना या धरणातून पाणीपुरवठा होणार आहे, त्यात्या महापालिकांनी या धरणाच्या कामात विस्थापित नागरिकांना आपापल्या प्राधिकरणात नोकरी देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेनेदेखील यातील काहींना नोकरीत सामावून घेण्याचे निश्चित केले आहे. ठाण्याला धरणातून पाणीपुरवठा होणार असून त्यानुसार पालिका या धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी महापालिका येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आधी ठरवलेल्या कोट्यानुसार धरणाची उंची वाढवल्यानंतर शिल्लक असलेले १०० दशलक्ष लीटर पाणी देण्यात येईल, हे ठरले होते. त्यानुसार, आता येथून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलण्यासाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तसेच येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावूनदेखील घेतले जाणार आहे. दरम्यान, भातसामधूनदेखील ठाणे महापालिका आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार आहे. यापूर्वी ठाणे महापालिका भातसामधून २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत होती. परंतु, आता अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणी उचलणार असल्याने महापालिकेला येथून एकूण ३०० दशलक्ष लीटर पाणी मिळणार आहे. ठामपाला सध्या शहरासाठी ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून वाढीव पाण्यामुळे ठाण्याला भविष्यात ६८० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यांना लागणारे पाणी याचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे.