शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आम्हाला केडीएमसीतून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:53 IST

सर्वपक्षीय युवा मोर्चाची पालिकेवर धडक : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, ही मागणी चार वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चातर्फे कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, मोर्चामुळे शिवाजी चौक ते शंकरराव चौक हा रस्ता तासाभरासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

युवा मोर्चाचे पदाधिकारी संतोष केणे, गणेश म्हात्रे, अर्जुन चौधरी, प्रकाश पाटील, गजानन पाटील, तकदीर काळण आदी ग्रामस्थांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मोर्चा काढला. मोर्चा महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आधीच रोखण्यात आला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. राज्य सरकार व महापालिकेविरोधात निषेधाचे फलक यावेळी झळकविण्यात आले.म्हात्रे यांनी सांगितले की, ‘२०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीत संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेची साथ बहिष्काराला मिळाली नाही. त्यामुळे समितीने त्यांचे उमेदवार उभे केले. निवडून आलेल्या २७ गावांतील १२ नगरसेवकांनी महापालिकेतील सत्ता समर्थनात शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे तेथे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला. परंतु, १२ नगरसेवक स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी समर्थन देणारे नसतील, तर त्यांनी त्यांच्या नगरसेवकपदाचे राजीनामे द्यावेत, अन्यथा युवा मोर्चा त्यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवेल.’

पाटील म्हणाले की, ‘दरवेळेस २७ गावांतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, महापालिकेच्या हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी २७ गावांकडे बोट दाखविले जाते. याचा विचार प्रशासनाकडून गांभीर्याने करणे गरजेचे आहे.’ महापालिकेत ही गावे समाविष्ट केल्यावर सप्टेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारने गावे वगळण्याची प्राथमिक अधिसूचना काढली. त्यासाठी हरकती, सूचना मागविल्या. या अधिसूचनेला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. त्यामुळे या अधिसूचनेची परिपूर्तता करून गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने उपायुक्त मारुती खोडके यांना एक निवेदन दिले. ते निवेदन नगरविकास खाते, कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले जाणार आहे, असे खोडके यांनी सांगितले. दरम्यान, स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा नागपूर हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर राज्य सरकारने हद्दवाढ अनुदान दिले नाही. रस्ते खराब आहेत, त्यासाठी महापालिकेने ३२७ कोटींचा निधी मागविला आहे. तोही दिलेला नाही. सुविधा दिल्या जात नसताना कर वाढविण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून हा कर २७ गावांतील जनतेने सोयीसुविधा नसताना जास्तीचा कर का भरावा, असा सवाल त्यांनी केला.आम्हाला वेगळे व्हायचे आहे२७ गावांमध्ये ग्रामपंचायत असताना गावातील नागरिकांना अत्यंत कमी मालमत्ताकर लागू होता. महापालिका दहापटीने जास्त मालमत्ताकराची आकारणी करते. त्यामुळे हा कर भरणार नाही. आम्हाला कर कमी करून नको तर आम्हाला वेगळे व्हायचे आहे, असा मुद्दा यावेळी उपस्थित केला गेला.