शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात मृत प्राणी, पक्षी आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : शहरातील गणपती मंदिरालगतच्या जावई पाडा परिसरात एकाच वेळेला अनेक पक्षी व प्राणी मृतावस्थेत आढळल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

टिटवाळा : शहरातील गणपती मंदिरालगतच्या जावई पाडा परिसरात एकाच वेळेला अनेक पक्षी व प्राणी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या परिसरात उग्र दर्प येऊ लागल्याने येथील नागरिकांनी पाहणी केली असता त्यांना बाजूला असलेल्या झाडाझुडपात काही पक्षी आणि प्राणी मरून पडल्याचे आढळून आले. याबाबत प्राणिमित्र संघटनेला कळवल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जावई पाडा परिसरात उग्र दर्प पसरल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले होते. येथील नागरिकांनी आजूबाजूला पाहणी केली असता थारवानी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या झाडीतून उग्र वास येत असल्याची बाब उघडकीस आली. अधिक जवळ जाऊन पाहणी केली असता तेथे एकाच वेळी सात कुत्रे, पाच कावळे आणि काही कोंबड्या मरून पडल्याचे आढळून आले. या पक्ष्यांना व प्राणांना विषबाधा झाला असल्याचा अथवा कोणीतरी जाणीवपूर्वक अन्नातून विष दिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर परिसरातील नागरिकांनी डब्ल्यूएआरआर या प्राणिमित्र संस्थेला याबाबत माहिती दिली. प्राणिमित्र संस्थेच्या सदस्यांनी या ठिकाणी पाहणी करून या प्रकाराबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अशोक कुडव करत आहेत.

--------------