शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

१५ आॅगस्टला सर्वत्र ‘साउंड म्यूट डे’, पाला संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:59 IST

डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.

कल्याण : साऊंड आणि लायटिंगसाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ६६ डेसिबलच्या आवाजाच्या मर्यादेत ध्वनिक्षेपणाचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.ही ‘आवाजबंदी’ त्या दिवशी राज्यभरात असेल. या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि ती मर्यादा वाढवून द्यावी, या मागणीसाठी दीड महिन्यात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या ‘साऊंड म्यूट डे’ मुळे १५ आॅगस्टची देशभक्तीपर गीते, त्याचदिवशी साजºया होणाºया दहीहंडीच्या डीजेची धम्माल ऐकायला मिळणार नाही. सारे काही शांततेत-आवाजविरहित पार पडेल, असे सांगत नायडू म्हणाले, ‘पाला’ ही संघटना देशातील २५ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. देशभरातील १० लाख लोकांचा पोटा-पाण्याचा व्यवसाय ‘साऊंड आणि लायटिंग’वर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आवाजावर मर्यादा घालून दिली आहे. त्यात ६६ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा ओलांडणाºया साऊंट व लायटिंग व्यावसायिकांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. ही मर्यादा पाळत साऊंड सिस्टिम चालविणे शक्य नाही. सरकारने तर साऊंडचे परवाने देणे बंद केले आहे. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त साऊंड सिस्टिम चालविणारे व्यावसायिक आहेत. आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांचे मरण ओढवले आहे.आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. तसेच आवाजाची मर्यादाही ओलांडायची नाही. सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे नायडू यांनी सांगितले.गप्पाही मर्यादेबाहेरन्यायालयाने घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवून देताना नायडू म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती परस्परांशी गप्पा मारतात तेव्हा त्याचीच पातळी अनेकदा ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा जेथे ध्वनिक्षेपकांचा वापर होतो अशा कार्यक्रमांत आवाजाची ही पातळी राखणे कठीण आहे.साऊंड सिस्टिम चालविणारा तांत्रिक शिक्षण घेतलेला असतो. पोलीस उद्धट वर्तन करतात. लाठी उगारतात. तसेच प्रसंगी त्यांच्या साऊंड सिस्टिमचे नुकसान करतात. हा आमचा उद्योग आहे. पण पोलीस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. गैरवर्तन करतात. त्याचाही त्रास होतो. याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.