शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

१५ आॅगस्टला सर्वत्र ‘साउंड म्यूट डे’, पाला संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:59 IST

डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.

कल्याण : साऊंड आणि लायटिंगसाठी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ६६ डेसिबलच्या आवाजाच्या मर्यादेत ध्वनिक्षेपणाचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली.ही ‘आवाजबंदी’ त्या दिवशी राज्यभरात असेल. या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि ती मर्यादा वाढवून द्यावी, या मागणीसाठी दीड महिन्यात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या ‘साऊंड म्यूट डे’ मुळे १५ आॅगस्टची देशभक्तीपर गीते, त्याचदिवशी साजºया होणाºया दहीहंडीच्या डीजेची धम्माल ऐकायला मिळणार नाही. सारे काही शांततेत-आवाजविरहित पार पडेल, असे सांगत नायडू म्हणाले, ‘पाला’ ही संघटना देशातील २५ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. देशभरातील १० लाख लोकांचा पोटा-पाण्याचा व्यवसाय ‘साऊंड आणि लायटिंग’वर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आवाजावर मर्यादा घालून दिली आहे. त्यात ६६ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची मर्यादा ओलांडणाºया साऊंट व लायटिंग व्यावसायिकांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. ही मर्यादा पाळत साऊंड सिस्टिम चालविणे शक्य नाही. सरकारने तर साऊंडचे परवाने देणे बंद केले आहे. अनेकांनी लाखो रुपये खर्च करुन साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त साऊंड सिस्टिम चालविणारे व्यावसायिक आहेत. आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांचे मरण ओढवले आहे.आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नाही. तसेच आवाजाची मर्यादाही ओलांडायची नाही. सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे नायडू यांनी सांगितले.गप्पाही मर्यादेबाहेरन्यायालयाने घेतलेल्या निर्णयातील त्रुटी दाखवून देताना नायडू म्हणाले, जेव्हा दोन व्यक्ती परस्परांशी गप्पा मारतात तेव्हा त्याचीच पातळी अनेकदा ६६ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम किंवा जेथे ध्वनिक्षेपकांचा वापर होतो अशा कार्यक्रमांत आवाजाची ही पातळी राखणे कठीण आहे.साऊंड सिस्टिम चालविणारा तांत्रिक शिक्षण घेतलेला असतो. पोलीस उद्धट वर्तन करतात. लाठी उगारतात. तसेच प्रसंगी त्यांच्या साऊंड सिस्टिमचे नुकसान करतात. हा आमचा उद्योग आहे. पण पोलीस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. गैरवर्तन करतात. त्याचाही त्रास होतो. याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.