शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

लाखोंचं घर घेऊनही पाच वर्षे प्यायला पाणी नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात धड प्यायला पाणीही उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे संतप्त सदनिकाधारकांनी एका बिल्डरच्या ऑफिसला बुधवारी टाळे ठोकत घोषणाबाजी केली. तसेच अंबरनाथमध्ये घर घेत असाल, तर फसवणूक करणाऱ्या विकासकांपासून सावधान... असा प्रचारही त्रस्त सदनिकाधारकांनी सुरू केला आहे.

येथील सदनिकाधारकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी पाणीच नसून दरवर्षी मात्र पावसाळ्यात अनेकदा पाणी साचून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील चार वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून अद्याप पाणी नागरिकांना उपलब्ध झालेले नाही, सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी, गढूळ आणि पिवळे पाणी नागरिकांना पुरवण्यात येत आहे.

अंबरनाथ शहरातील शिवमंदिरच्या मागील बाजूस काही वर्षात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याठिकाणी चार ते पाच हजार नागरिकांची लोकवस्तीही आहे. बहुतांश नागरिकांनी कर्ज काढून याठिकाणी घरे खरेदी केली आहेत. परंतु त्या घरात राहण्यासाठी आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले आहे. मागील पाच वर्षांपासून नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नाही. नागरिकांना पाणी लगेच देऊ. असे आश्वासन विकासकाने दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून बोअरिंगचे फिल्टर केलेले पाणी आणि टँकरचे पाणी बिल्डर नागरिकांना पाजत आहेत.

एवढेच नव्हे, तर टोलेजंग इमारतीचे बांधकाम करताना बिल्डरांनी आपल्या फायद्यासाठी मोठमोठे नाले अरुंद केल्याने दरवर्षी अनेक इमारतीत पाणी साचून तलावजन्य परिस्थिती निर्माण होते. याला जबाबदार कोण, बिल्डर की नगरपालिका, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांनी याविरुद्ध आवाज उठवला असून, बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

--------