शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

संचारबंदीतही मॉर्निंगवॉकवाले सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा ...

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. गांभीर्य नसलेले ठाणेकर मॉर्निंग वॉकला उतरल्याचे दिसून आले. त्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठवले. तर रेल्वेच्या तिकीट खिडकीवर आणि रेल्वेतही नेहमीप्रमाणे गर्दी हाेती. तर मार्केटमध्येही भाजी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. दुसरीकडे पोलिसांचे लसीकरण सुरू झाल्याने नाकाबंदीतही काहीशी शिथिलता दिसली.

राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही संचारबंदीचा फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. पहाटेच जांभळी नाक्यावर तलावाभोवती मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या नागरिकांना समज देऊन घरी पाठविले. अशीच काहीशी परिस्थिती घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागातही हाेती. तेथेही मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडले होते. दुसरीकडे, मार्केट परिसरही सुरू होता. बॅरिकेड्स लावण्यात आले असतानाही मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक जात होते. तसेच सार्वजनिक वाहतूक बस, रिक्षांतही गर्दी दिसत होती. त्यामुळे संचारबंदी आहे का, असा सवाल उपस्थित होत होता. दुसरीकडे रेल्वे तिकीट खिडकीवरही नेहमीप्रमाणे रांगा दिसत होत्या. रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यूआर कोड तपासताना दिसत नव्हते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाने ये-जा

ठाणे शहरातील जांभळी नाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत होते. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावले होते. तरीही पळवाटा काढत काही नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देत येथे ये-जा करत होते. शहरातील इतर ठिकाणीही नागरिकांची तुरळक वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केट नेहमीप्रमाणे सुरू होते.