शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

संचारबंदीतही मॉर्निंगवॉकवाले सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा ...

ठाणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पर्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. गांभीर्य नसलेले ठाणेकर मॉर्निंग वॉकला उतरल्याचे दिसून आले. त्यांना समज देऊन पोलिसांनी घरी पाठवले. तर रेल्वेच्या तिकीट खिडकीवर आणि रेल्वेतही नेहमीप्रमाणे गर्दी हाेती. तर मार्केटमध्येही भाजी खरेदीसाठी गर्दी दिसत होती. दुसरीकडे पोलिसांचे लसीकरण सुरू झाल्याने नाकाबंदीतही काहीशी शिथिलता दिसली.

राज्य शासनाने पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. ठाणे महापालिकेनेही शहरात काय सुरू राहील, काय बंद राहील याची नियमावली जाहीर केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीही संचारबंदीचा फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. पहाटेच जांभळी नाक्यावर तलावाभोवती मॉर्निंग वॉकला नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या नागरिकांना समज देऊन घरी पाठविले. अशीच काहीशी परिस्थिती घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागातही हाेती. तेथेही मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडले होते. दुसरीकडे, मार्केट परिसरही सुरू होता. बॅरिकेड्स लावण्यात आले असतानाही मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक जात होते. तसेच सार्वजनिक वाहतूक बस, रिक्षांतही गर्दी दिसत होती. त्यामुळे संचारबंदी आहे का, असा सवाल उपस्थित होत होता. दुसरीकडे रेल्वे तिकीट खिडकीवरही नेहमीप्रमाणे रांगा दिसत होत्या. रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यूआर कोड तपासताना दिसत नव्हते.

अत्यावश्यक सेवेच्या नावाने ये-जा

ठाणे शहरातील जांभळी नाका, स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने येथे सकाळी नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत होते. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावले होते. तरीही पळवाटा काढत काही नागरिक अत्यावश्यक सेवेचे कारण देत येथे ये-जा करत होते. शहरातील इतर ठिकाणीही नागरिकांची तुरळक वर्दळ दिसत होती. कळव्यातही भाजी मार्केट नेहमीप्रमाणे सुरू होते.