शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला पर्यावरण अहवालाचे वावडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : शहरातील पर्यावरणाची सद्य:स्थिती दाखवणारा २०२०-२१चा पर्यावरण अहवाल केडीएमसीकडून ठरावीक वेळेत जाहीर झालेला नाही. ३१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : शहरातील पर्यावरणाची सद्य:स्थिती दाखवणारा २०२०-२१चा पर्यावरण अहवाल केडीएमसीकडून ठरावीक वेळेत जाहीर झालेला नाही. ३१ जुलैपर्यंत हा अहवाल अपेक्षित असताना तो तयारच झालेला नाही. दरवर्षीप्रमाणे मनपाने यंदाही विलंबाची परंपरा कायम ठेवली आहे. अहवाल तयार करण्याच्या कामासाठी नुकतीच एजन्सी नियुक्त केली आहे; पण कार्यादेश दिलेले नाहीत. त्यामुळे अहवाल तयार होऊन त्याच्या सादरीकरणाला नोव्हेंबर उजाडेल, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

शहरीकरणामुळे कल्याण-डोंबिवलीत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यात वाहनांची संख्याही वाढत असून, वाहतूक कोंडीची समस्याही जटली बनली आहे. दुसरीकडे अद्यापही कचरा आधारवाडी डम्पिंगवर टाकला जात आहे. डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यांचे प्रदूषणही अधून मधून डोके वर काढत आहे. जलप्रदूषणामुळे शहरांमधील तलावही नामशेष होऊ लागले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अहवाल म्हणजे शहराच्या आरोग्याची स्थिती दर्शविणारा असल्याचे मानले जाते.

पर्यावरण अहवालात शहराची भौगोलिक स्थिती, भू-पर्यावरण, जल-वायू-ध्वनी पर्यावरण व त्याची तपासणी, जल व्यवस्थापन व त्याचा दर्जा, जलनिस्सारण आणि मलनिस्सारण यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट, शहराचे सुशोभीकरण, तलाव-नदी-खाडी व परिसर प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना यांच्या सद्य:स्थितीची माहिती तपशीलवारपणे मांडली जाते. याच अहवालाच्या आधारे शहराच्या विकासाचे नियोजन करण्याची दिशा ठरवली जाते. मनपाकडून सादर होणाऱ्या अहवालात मांडलेल्या वस्तुस्थितीची आणि त्यावर उपाययोजना म्हणून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होते हा संशोधनाचा विषय असताना अहवाल तयार करून तो सादरीकरण करण्याची विलंबाची परंपरा यंदाही केडीएमसीने कायम ठेवली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये महत्त्वाच्या सोयीसुविधांचा अभाव असताना येथील सुमारे १६ लाखांच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेला पर्यावरण अहवाल तयार करण्याबाबत मनपा प्रशासन सुस्त असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. महत्त्वाचे म्हणजे जल, मलनिस्सारण विभागाला संलग्न असलेला पर्यावरण विभाग नुकताच स्वतंत्र करून त्यासाठी प्रभारी कार्यकारी अभियंता नियुक्त केला आहे. त्यामुळे यापुढे तरी कारभारात सुधारणा होईल का, असा सवाल केला जात आहे.

----------------------

पर्यावरणाविषयी आस्था नाही

पर्यावरणाला नेहमीच केडीएमसीकडून शेवटचे स्थान दिले जाते. परिणामी जल-वायू-ध्वनी प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयानेही प्रदूषणासारख्या समस्यांवर मनपाला फटकारले आहे; परंतु सुधारणा होत नाही हे तितकेच खरे. मनपाला रस्ते बांधायचे आहेत, बांधकामे होत आहेत त्यासाठी झाडे तोडली जात आहेत. यात पर्यावरणावर ताण पडत आहे. त्याचा कोणीही अभ्यास करीत नाही.

- अश्विन अघोर, पर्यावरणतज्ज्ञ

--

महिनाभरात अहवाल देऊ

यासंदर्भात मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता (यांत्रिकी) गोपाळ भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पर्यावरण अहवालासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. महिनाभरात अहवाल तयार करून तो सादर केला जाईल, असे सांगितले.

----