शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 15, 2020 16:57 IST

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले.

ठळक मुद्देसुशांतसोबतची कॉफीशॉप मधील भेट कायम स्मरणात राहील - शिरीष लाटकरसुशांत अतिशय नम्र, अभ्यासू नट होता- लाटकरपवित्र रिशता मधील सुशांत डोळ्यांसमोर आला

ठाणे : सुशांतच्या आत्महत्त्येची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली. तो इतक्या टोकाचे पाऊल उचलणारा अभिनेता नव्हता, तो यशस्वी अभिनेता होता, त्याला मिळालेले यश हे सगळ्या गोष्टींवर मात करायला पुरेसे होते असे भावुक उद्गार ठाण्यातील मराठी- हिंदी मालिकांचे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी काढले..                      पवित्र रिशता या मालिकेचे संवाद लेखन लाटकर यांनी केले होते. या मालिकेच्या सेट वर पहिली भेट सुशांत सोबत मे 2009 मध्ये झाली होती. त्यांनतर मालिकेनिमित्ताने त्याला तीन ते चार वेळा भेटलो होतो. मराठी वातावरणातील ही मालिका होती. मराठी कलाकारांची मांदियाळी या मालिकेत होती. सुशांतच्या संवादात दोन ते तीन मराठी शब्द असत ते मी त्याला समजावून सांगायचो. एक बिहारी मुलगा हे शब्द खूप अभ्यासपूर्ण समजून घ्यायचा. तो त्या मराठी वातावरणातील मालिकेत संपूर्ण मिसळून गेला होता. तो मराठी वाटला होता अशी आठवण लाटकर यांनी पुढे बोलताना सांगितली. तो फोन करूनही संवाद समजून घ्यायचा. तो अतिशय नम्र, मोकळा अभिनेता होता हे मला त्याच्या वागण्यातून नेहमी जाणवत असे. मला त्याचे नेहमी कौतुक असे, नेहमी सकारात्मक वृत्तीचा, यश मिळूनही पाय जमीनीवर असलेला, गॉड फादर नसलेला सेल्फ मेड मॅन असलेला अभिनेता होता. नटांचे पडद्यावरचे आणि प्रत्यक्षातले हास्य हे वेगळे असते, पण तो मात्र निर्मळ मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावरील 'स्माईल'चे लाखो चाहते होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचे 'स्माईल' हे मात्र निर्मळ होते असे लाटकर यांनी सांगितले. त्याच्या आठवणींना उजाळा देताना लाटकर म्हणाले की, सुशांतने दोन वर्षांनी पवित्र रिशता ही मालिका सोडली. त्यांनंतर अडीच वर्षे आमची भेट नव्हती. मी एका मालिकेसंदर्भात अंधेरी येथील कॉफीशॉपमध्ये बसलो होतो, त्यावेळी सुशांतचा 'काय पोछे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. थोड्यावेळाने त्या शॉपमध्ये सुशांत आला, मी त्याला पाहिले खरे पण त्याच्याकडे जायचे कसे हा प्रश्न होता थोड्यावेळाने त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो अतीशय नम्रपणे माझ्याकडे येऊन 'क्या सर कैसे हो?' असे विचारत चार ते पाच मिनिटे गप्पा मारून तो ठेथजन निघाला आणि ती शेवटची भेट कायम स्मरणात राहिली.

टॅग्स :thaneठाणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या