शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 15, 2020 16:57 IST

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले.

ठळक मुद्देसुशांतसोबतची कॉफीशॉप मधील भेट कायम स्मरणात राहील - शिरीष लाटकरसुशांत अतिशय नम्र, अभ्यासू नट होता- लाटकरपवित्र रिशता मधील सुशांत डोळ्यांसमोर आला

ठाणे : सुशांतच्या आत्महत्त्येची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली. तो इतक्या टोकाचे पाऊल उचलणारा अभिनेता नव्हता, तो यशस्वी अभिनेता होता, त्याला मिळालेले यश हे सगळ्या गोष्टींवर मात करायला पुरेसे होते असे भावुक उद्गार ठाण्यातील मराठी- हिंदी मालिकांचे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी काढले..                      पवित्र रिशता या मालिकेचे संवाद लेखन लाटकर यांनी केले होते. या मालिकेच्या सेट वर पहिली भेट सुशांत सोबत मे 2009 मध्ये झाली होती. त्यांनतर मालिकेनिमित्ताने त्याला तीन ते चार वेळा भेटलो होतो. मराठी वातावरणातील ही मालिका होती. मराठी कलाकारांची मांदियाळी या मालिकेत होती. सुशांतच्या संवादात दोन ते तीन मराठी शब्द असत ते मी त्याला समजावून सांगायचो. एक बिहारी मुलगा हे शब्द खूप अभ्यासपूर्ण समजून घ्यायचा. तो त्या मराठी वातावरणातील मालिकेत संपूर्ण मिसळून गेला होता. तो मराठी वाटला होता अशी आठवण लाटकर यांनी पुढे बोलताना सांगितली. तो फोन करूनही संवाद समजून घ्यायचा. तो अतिशय नम्र, मोकळा अभिनेता होता हे मला त्याच्या वागण्यातून नेहमी जाणवत असे. मला त्याचे नेहमी कौतुक असे, नेहमी सकारात्मक वृत्तीचा, यश मिळूनही पाय जमीनीवर असलेला, गॉड फादर नसलेला सेल्फ मेड मॅन असलेला अभिनेता होता. नटांचे पडद्यावरचे आणि प्रत्यक्षातले हास्य हे वेगळे असते, पण तो मात्र निर्मळ मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावरील 'स्माईल'चे लाखो चाहते होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचे 'स्माईल' हे मात्र निर्मळ होते असे लाटकर यांनी सांगितले. त्याच्या आठवणींना उजाळा देताना लाटकर म्हणाले की, सुशांतने दोन वर्षांनी पवित्र रिशता ही मालिका सोडली. त्यांनंतर अडीच वर्षे आमची भेट नव्हती. मी एका मालिकेसंदर्भात अंधेरी येथील कॉफीशॉपमध्ये बसलो होतो, त्यावेळी सुशांतचा 'काय पोछे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. थोड्यावेळाने त्या शॉपमध्ये सुशांत आला, मी त्याला पाहिले खरे पण त्याच्याकडे जायचे कसे हा प्रश्न होता थोड्यावेळाने त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो अतीशय नम्रपणे माझ्याकडे येऊन 'क्या सर कैसे हो?' असे विचारत चार ते पाच मिनिटे गप्पा मारून तो ठेथजन निघाला आणि ती शेवटची भेट कायम स्मरणात राहिली.

टॅग्स :thaneठाणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या