शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली - शिरीष लाटकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 15, 2020 16:57 IST

पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली असे भावुक उद्गार शिरीष लाटकर यांनी काढले.

ठळक मुद्देसुशांतसोबतची कॉफीशॉप मधील भेट कायम स्मरणात राहील - शिरीष लाटकरसुशांत अतिशय नम्र, अभ्यासू नट होता- लाटकरपवित्र रिशता मधील सुशांत डोळ्यांसमोर आला

ठाणे : सुशांतच्या आत्महत्त्येची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आणि पवित्र रिशता ही संपूर्ण मालिका डोळ्यांसमोर उभी राहिली. तो इतक्या टोकाचे पाऊल उचलणारा अभिनेता नव्हता, तो यशस्वी अभिनेता होता, त्याला मिळालेले यश हे सगळ्या गोष्टींवर मात करायला पुरेसे होते असे भावुक उद्गार ठाण्यातील मराठी- हिंदी मालिकांचे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी काढले..                      पवित्र रिशता या मालिकेचे संवाद लेखन लाटकर यांनी केले होते. या मालिकेच्या सेट वर पहिली भेट सुशांत सोबत मे 2009 मध्ये झाली होती. त्यांनतर मालिकेनिमित्ताने त्याला तीन ते चार वेळा भेटलो होतो. मराठी वातावरणातील ही मालिका होती. मराठी कलाकारांची मांदियाळी या मालिकेत होती. सुशांतच्या संवादात दोन ते तीन मराठी शब्द असत ते मी त्याला समजावून सांगायचो. एक बिहारी मुलगा हे शब्द खूप अभ्यासपूर्ण समजून घ्यायचा. तो त्या मराठी वातावरणातील मालिकेत संपूर्ण मिसळून गेला होता. तो मराठी वाटला होता अशी आठवण लाटकर यांनी पुढे बोलताना सांगितली. तो फोन करूनही संवाद समजून घ्यायचा. तो अतिशय नम्र, मोकळा अभिनेता होता हे मला त्याच्या वागण्यातून नेहमी जाणवत असे. मला त्याचे नेहमी कौतुक असे, नेहमी सकारात्मक वृत्तीचा, यश मिळूनही पाय जमीनीवर असलेला, गॉड फादर नसलेला सेल्फ मेड मॅन असलेला अभिनेता होता. नटांचे पडद्यावरचे आणि प्रत्यक्षातले हास्य हे वेगळे असते, पण तो मात्र निर्मळ मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावरील 'स्माईल'चे लाखो चाहते होते कारण त्याच्या चेहऱ्यावरचे 'स्माईल' हे मात्र निर्मळ होते असे लाटकर यांनी सांगितले. त्याच्या आठवणींना उजाळा देताना लाटकर म्हणाले की, सुशांतने दोन वर्षांनी पवित्र रिशता ही मालिका सोडली. त्यांनंतर अडीच वर्षे आमची भेट नव्हती. मी एका मालिकेसंदर्भात अंधेरी येथील कॉफीशॉपमध्ये बसलो होतो, त्यावेळी सुशांतचा 'काय पोछे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. थोड्यावेळाने त्या शॉपमध्ये सुशांत आला, मी त्याला पाहिले खरे पण त्याच्याकडे जायचे कसे हा प्रश्न होता थोड्यावेळाने त्याची नजर माझ्यावर गेली आणि तो अतीशय नम्रपणे माझ्याकडे येऊन 'क्या सर कैसे हो?' असे विचारत चार ते पाच मिनिटे गप्पा मारून तो ठेथजन निघाला आणि ती शेवटची भेट कायम स्मरणात राहिली.

टॅग्स :thaneठाणेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या