शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

केडीएमसीच्या १४२ आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण

By admin | Updated: February 29, 2016 01:52 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १४२ आरक्षित भूखंड अतिक्रमित झालेले असून त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील १४२ आरक्षित भूखंड अतिक्रमित झालेले असून त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही. ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाने ही माहिती उघड केली आहे. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आरक्षित भूखंड व त्यावर झालेली अतिक्रमणे किती, याविषयी तीन वर्षांपूर्वी माहिती मागितली होती. त्यांना महापालिकेने लेखी स्वरूपात माहिती दिली. ही माहिती २००० सालापूर्वीची आहे. आजच्या सद्य:स्थितीनुसार प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यास ही स्थिती चौपटीने जास्त असणार असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. महापालिकेच्या १९९६ साली तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात १२१२ आरक्षणे आहेत. या आरक्षणाचे एकूण क्षेत्र ९६१ हेक्टर इतके आहे. हे भूखंड स्मशानभूमी, ट्रक टर्मिनस, घनकचरा व्यवस्थापन, भाजी मार्केट, प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, मनोरंजन केंद्र, अग्निशमन केंद्र, महिला कल्याण केंद्र, दवाखाना, प्रसूतिगृह, वाहनतळ, कलादालन, मटण मार्केट, जलकुंभ, पोलीस स्टेशन, बगिचा, बेघरांसाठी घरे, फेरीवाला, वाचनालय, दूरध्वनी केंद्र, पोस्ट आॅफिस या विविध सार्वजनिक वापरासाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. १९९६ सालचा विकास आराखडा हा २०१२ साली मंजूर झाला. त्याला अंतिम मंजुरी दिली गेली. या विकास आराखड्यात शहराचे सात सेक्टर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक व दोन सेक्टरला सरकारने अंशत: मंजुरी दिली होती. त्यानंतर, उर्वरित तीन ते सात सेक्टरला मंजुरी दिली. विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी इतकी वर्षे लागली. नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. १९९६ पासून विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करण्यावर महापालिका प्रशासनाने भरच दिलेला नाही. आरक्षित भूखंडांपैकी बेघरांसाठी घरे बांधण्याकरिता जास्त प्रमाणात भूखंड आहेत. तेच अतिक्रमित करण्यात आले असून त्यावर बेकायदा बांधकामे झालेली आहेत. याविषयी नगरसेवक म्हात्रे यांनी आवाज उठवला आहे. अतिक्रमण रोखण्याचे काम प्रभाग अधिकाऱ्यांकडे असल्याचे लेखी उत्तर महापालिकेने म्हात्रे यांना दिले आहे. एकाही प्रभाग अधिकाऱ्याने अतिक्रमण रोखलेले नसून २००० सालानंतर अतिक्रमण झालेल्या भूखंडांचा आकडा चौपट असेल. अतिक्रमणास जबाबदार असलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी करावी. त्याचा अहवाल महिनाभरात महासभेच्या पटलावर ठेवण्याची म्हात्रे यांची मागणी आहे.