शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या अनेक पिढ्यांना मच्छीमारांनी पुरविला रोजगार

By admin | Updated: September 26, 2016 01:58 IST

जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाला सर्वात जास्त जबाबदार ठरणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम पालघर जिल्ह्यातील

हितेन नाईक, पालघरजिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाला सर्वात जास्त जबाबदार ठरणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर राहणारा मच्छीमार समाज अनेक वर्षांपासून करीत आहे.आज विक्रमगड, तलासरी, जव्हार, वाडा येथील ४ ते ५ हजार कुटुंब प्रमुखांना रोजगार व त्यांच्या राहण्याची सोय करून त्यांना विम्याचे कवच मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम मच्छीमार करीत आहेत. पालघर जिल्ह्यात झाई ते वसई दरम्यान १०७ कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा पसरला आहे. या किनारपट्टीवरील वसई, नायगाव, अर्नाळा, दातिवरे, एडवन, केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, डहाणू, इ. मच्छिमार गावातून सुमारे ३ हजार लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. यातील एका नौकेवर साधारणपणे ७ ते २० लोकांची कामगार म्हणून गरज भासते. त्यामुळे आज ४ ते ५ हजार कामगारांना रोजगाराची महत्वपूर्ण संधी मच्छीमार व्यवसायातून मिळत आहे. नवीन कामगाराला ८ ते १२ हजारा प्रती महिना पर्यंत पगार दिला जात असून मुख्य तांडेल म्हणून काम करणाऱ्याला ८ महिन्याचा २ ते ३ लाखापर्यंत पगार दिला जात आहे. दोन वेळचे जेवण, नाश्ता, दाढी, वैद्यकीय उपचार, करमणुकीची साधने, झोपण्याची साहित्य इ, सुविधाही नौका मालका कडून विनामूल्य पुरवल्या जात आहेत. या व्यतिरिक्त एखादा अपघात झाल्यास २ लाखाच्या निधीचे विमा कवचही त्यांना देण्यात येत असल्याने अनेक कुटुंबे मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून या व्यवसायात आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, इ. तालुक्यातील कुपोषणाचे पडसाद राज्यभर उमटले असून हा कुपोषणाचे पूर्णत: उच्चाटन करायचे असेल तर कुपोषणग्रस्त भागात रोजगार निर्मिती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महिला, बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यामुळे नरेगा, मगांरोहमी योजनांची कामे तात्काळ हाती घेण्याचे आदेश ही जिल्हा प्रशासन यंत्रणांना देण्यात आले आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी करताना मोठा भ्रष्टाचार होऊन बोगस नावे मस्टर मध्ये नोंदवून पैसे लाटण्याचे धंदे जोरात सुरु होते. जिथे कामे हाती घेण्यात आली होती, त्यावरील कामगारांच्या खात्यात २-४ महिने पैसेच जमा होत नसल्याने उपासमारी आणि दारिद्र्याला कंटाळून ते कच्च्या-बच्च्यांसह रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरे करीत आहेत. ही मोठ्या प्रमाणात होणारी स्थलांतरे रोखण्याचे काम प्रशासना कडून करण्याचा प्रयत्न अनेक योजना मार्फत केली जात असली तरी मच्छीमारी व्यवसायातून मिळाले ली रोजगाराची हमी, घेण्यात येत असलेली काळजी तसेच रोजगारा सोबत त्यांना घरातील कुटुंबातील सदस्या प्रमाणे आपुलकीची वागणूक असल्याने तीन पिढ्यातील सदस्य एकाच मच्छीमार कुटुंबात अनेक वर्षा पासून राहत आहेत. विक्रमगडच्या दादडा पाड्यातील देवू जाबर (६२), गोविंद गिम्बल (६१), शिवा आणि सखाराम फरारा (५९) या दोन बंधू सह अनेक आदिवासी कुटुंबातील सदस्य मागील चाळीस ते पन्नास वर्षा पासून सातपाटी येथे आपल्या नौकेवर कार्यरत असल्याचे कव-दालदा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी लोकमत ला सांगितले.