शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 16:55 IST

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना काळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतासाठी प्रत्येकी ५ हजार रूपये मंजूर केल्या बद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंताची गणना कधी केली? असा प्रश्न उपस्थित करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. तसेच कलावंताची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती दिली. 

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. याबाबत त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असतांना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली?, त्यांच्यात सर्व कलावंताचे नाव आहे का?, ज्यांनी यादी बनविली, त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का?, असेलतर कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करावी. आदी अनेक प्रश्न कलावंताना पडले. त्यांच्या भावनाना वाट करून देण्यासाठी गायिका निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, ब्यांड पथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमी वरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्स मध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणारे कलावंत आदीचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करून कलावंताची यादी तयार करावी. अशी मागणी निशा भगत यांनी शासनाकडे केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहे नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणी केली. 

५ हजाराचे मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

 राज्य शासनाने कोरोना काळात राज्यातील कलावंता साठी ५ हजार रुपये प्रत्येकी मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र ५ हजार रुपये मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय? असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होई पर्यंत दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर