शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 16:55 IST

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना काळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतासाठी प्रत्येकी ५ हजार रूपये मंजूर केल्या बद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंताची गणना कधी केली? असा प्रश्न उपस्थित करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. तसेच कलावंताची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती दिली. 

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. याबाबत त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असतांना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली?, त्यांच्यात सर्व कलावंताचे नाव आहे का?, ज्यांनी यादी बनविली, त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का?, असेलतर कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करावी. आदी अनेक प्रश्न कलावंताना पडले. त्यांच्या भावनाना वाट करून देण्यासाठी गायिका निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, ब्यांड पथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमी वरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्स मध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणारे कलावंत आदीचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करून कलावंताची यादी तयार करावी. अशी मागणी निशा भगत यांनी शासनाकडे केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहे नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणी केली. 

५ हजाराचे मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

 राज्य शासनाने कोरोना काळात राज्यातील कलावंता साठी ५ हजार रुपये प्रत्येकी मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र ५ हजार रुपये मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय? असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होई पर्यंत दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर