शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

उल्हासनगरात रविवारी कलावंताची एल्गार परिषद; राज्य शासनाची ५६ हजार कलावंताची गणना कोणत्या आधारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 16:55 IST

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कोरोना काळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतासाठी प्रत्येकी ५ हजार रूपये मंजूर केल्या बद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंताची गणना कधी केली? असा प्रश्न उपस्थित करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. तसेच कलावंताची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती दिली. 

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतासाठी कोरोना काळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५००० रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. याबाबत त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असतांना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली?, त्यांच्यात सर्व कलावंताचे नाव आहे का?, ज्यांनी यादी बनविली, त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का?, असेलतर कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करावी. आदी अनेक प्रश्न कलावंताना पडले. त्यांच्या भावनाना वाट करून देण्यासाठी गायिका निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, ब्यांड पथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमी वरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्स मध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणारे कलावंत आदीचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करून कलावंताची यादी तयार करावी. अशी मागणी निशा भगत यांनी शासनाकडे केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहे नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणी केली. 

५ हजाराचे मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

 राज्य शासनाने कोरोना काळात राज्यातील कलावंता साठी ५ हजार रुपये प्रत्येकी मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र ५ हजार रुपये मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय? असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होई पर्यंत दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर