शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आठवडेबाजार १४ वर्षांनंतर बंद

By admin | Updated: August 13, 2015 23:15 IST

ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या

ठाणे : ठाण्यातील सर्वसामान्यांचा बाजार म्हणून ओळखले जाणारे आठवडेबाजार अखेर १४ वर्षांनंतर बंद झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागांत भरणाऱ्या या बाजारांवर कारवाई करून ते कायमचे बंद केले आहेत. रहदारीला होणारा अडथळा, महिलांची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे ते बंद करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार, ही कारवाई केल्याची माहिती महापालिकेने दिली. हे बाजार बंद झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांबरोबर फेरीवाल्यांना देखील बसला आहे. परंतु, यामुळे गावगुंड आणि जागा भाड्याने देणाऱ्यांचा धंदाही बंद झाला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भेनाका येथे भरणारा आठवडाबाजार हा कळवा-बेलापूर पट्ट्यातील एकेकाळचा सर्वात मोठा बाजार मानला जात होता. ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा यासारख्या पट्ट्यातील गरीब कामगार, मजुरांची तेथे जत्रा भरत होती. फार पूर्वीपासून या बाजारांचे लोण पसरले होते. गावांमध्ये बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आणि यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना जागा भाड्याने मिळू लागल्या. या कामगारवर्गासाठी कपड्यांपासून गृहोपयोगी साहित्य, भाजीपाला, खाद्य-पेय, भांडी, खेळणी, स्त्रियांचे विविध प्रकारचे अलंकार आदी वस्तू स्वस्त दरात या बाजारांत उपलब्ध झाल्या. त्यामुळेच ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांतील आठवडाबाजार वेगळे महत्त्व राखून आहेत. मात्र, आठवड्यातील एका दिवसाकरिता भरणारे हे बाजार स्थानिक गुंडांच्या हप्तेखोरीचे साधन बनू लागले होते. या बाजारांत पदपथांवरील जागांचे दरही ठरू लागले होते. मोक्याची जागा मिळवायची असेल तर गल्लीगुंडाला हप्ता देण्याचा पायंडा पडला आणि पुढे महापालिका, पोलीस यांच्यापर्यंत ही साखळी तयार झाली होती. ठाण्यातील अरुंद रस्त्यांवर भरणारे हे बाजार शहरातील इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले होते. २००८ च्या सुमारास महापालिकेने याला बंदी घातली होती. त्यानंतर, २००९ मध्ये पुन्हा ते सुरू झाल्याने त्याला हप्तेखोरांचे कवच लाभले होते.