शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

करवसुलीचे लक्ष्य न गाठल्याने ७० टक्केच मिळणार पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० कोटींचे लक्ष्य न गाठता ७१ कोटींची वसुली केली असा ठपका ठेवत आयुक्तांनी वसुलीच्याप्रमाणात ७० टक्के पगार काढण्याचे आदेश विभागप्रमुख उपायुक्त मदन सोंडे यांना दिले आहेत. याप्रकाराने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाल्याने पगार नको अशी भूमिका घेतली आहे.

कोरोना काळात मालमत्ता कर बिले सहा महिने उशिराने गेल्याने ऑक्टोबर महिन्यानंतर खऱ्या अर्थाने विभागाची वसुली सुरू झाली. दरम्यान विभागाच्या कर निर्धारक संकलकपदी जेठानंद करमचंदानी यांची नियुक्ती केली. तर विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार सोंडे यांच्याकडे देण्यात आला. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळ असल्याने नागरिकांना सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत ७१ कोटींची वसुली केली. गेल्यावर्षी विभागाची ७७ कोटींची वसुली झाली होती. कोरोना काळातही गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याबद्दल विभागाचे कौतुक होत आहे.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मात्र विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण केले नाही असा ठपका ठेवला. सुट्टीवर जाण्यापूर्वी आयुक्तांनी सोंडे यांना मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुलीच्या प्रमाणात ७० टक्के काढण्याचे तोंडी आदेश दिले. आयुक्तांनी दिलेल्या आदेशनव्हे सोंडे यांनी करमचंदानी यांना विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ७० टक्के प्रमाणात वेतन बिल लेखा विभागाला पाठविण्यास सांगितले. याप्रकाराने विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. कोरोना काळात घरोघरी जाऊन कोणतीही सक्ती न कारण अवघ्या काही महिन्यात ७१ कोटींची वसुली करूनही ७० टक्के पगार देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला पगार नको, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत पगाराचे बिल पाठवू नका, अशी विनंती केल्याची माहिती करमचंदानी यांनी दिली.

-------------------

कर्मचारी संघटना आक्रमक

महापालिका मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी आयुतांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. सोमवारी आयुक्त सुट्टीवरून परत आल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतरही त्यांनी भूमिका बदलली नाहीतर, संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला.