शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

औषधांचे दर कमी होऊनही रुग्ण डायलिसीसवरच...

By admin | Updated: January 4, 2016 01:57 IST

सरकारने डायलिसीस रुग्णांना लागणाऱ्या औधषांच्या किमती कमी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र बाजारात आजही डायलिसीस रुग्णांची औषधे चढ्या दराने विकली जात

मुरलीधर भवार,  कल्याणसरकारने डायलिसीस रुग्णांना लागणाऱ्या औधषांच्या किमती कमी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र बाजारात आजही डायलिसीस रुग्णांची औषधे चढ्या दराने विकली जात असल्याने सरकारच्या निर्णयाचा फायदा रुग्णांना झालेलाच नाही. सरकारने घेतलेला निर्णय सरकारची आरोग्य यंत्रणा औषधांच्या दुकानांपर्यंत पोहोचवू शकलेली नाही. त्यामुळे हा निर्णय कागदावरच असल्याचा दावा डायलिसीस रुग्णांकडून केला जात आहे. कल्याणमधील नागरिक उल्हास जामदार यांचा मुलगा अजित याला किडनीचा आजार आहे. त्याला डायलिसीस करावे लागते. जामदार यांनी सांगितले की, त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलावर नियमित उपचार करू शकतात. मात्र, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा सर्वसामान्य रुग्णांनी आजाराचा खर्च कसा करायचा, हा त्यांच्यासमोर पेच आहे. सरकारने डायलिसीसच्या औषधांचे दर कमी केले. जवळपास २५ टक्के दर कमी होणे अपेक्षित होते. त्याचा इफेक्ट बाजारात दिसून येत नाही. बाजारात आजही आहे, त्याच दराने औषधे विकली जात आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. कल्याणमध्ये डायलिसीस करणारी फोर्टीज, मीरा, श्रीदेवी आणि अ‍ॅपेक्स ही रुग्णालये आहेत. रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसीस करावे लागते. एका वेळचा डायलिसीस व औषधांचा खर्च हा जवळपास १३५० रुपये आहे. आठवड्यातून तीन वेळा केल्यास महिन्याला ४० ते ४५ हजार रुपये खर्च एका रुग्णाला येतो. काही रुग्णालयांत डायलिसीससाठी १३५० रुपये आकारले जात होते. त्यात ५० रुपये वाढ करून हा दर १४०० करण्यात आला आहे. ही रुग्णालये खाजगी असल्याने त्यांच्या दरवाढीचा जाब कोण विचारणार, असा प्रश्न आहे. डोंबिवलीतील औषध उत्पादक व वितरक शांडिल्य फार्माचे विवेकानंद धवसे यांनी सांगितले की, डायलिसीसच्या औषधांच्या किमती सरकारने कमी केल्या असल्या तरी बाजारात इफेक्ट नाही. काही दुकानदारच कमी दराने विकत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. समजा, एखाद्या औषधाची किंमत साधारणत: १०० रुपये होती. ती कमी करून ६० रुपये करण्यात आली असेल तर कमी किंमत झालेल्या औषधाचे उत्पादन कंपन्यांकडून बंद केले जाते. त्यामुळे बाजारात त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. २०१३ साली औषध किंमत नियंत्रण आदेश-ड्रग प्राइज कंट्रोल आॅर्डरनुसार औषधांच्या किमती कमी झालेल्या आहेत. पण, औषधे वितरण करणाऱ्या कंपन्यांना वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. कल्याण-डोंबिवलीतील रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयांत डायलिसीस सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एका रुग्णालयात पाच मशीन खरेदी केल्यास एक कोटी ३० लाख रुपये खर्च होऊ शकतात. एका रुग्णाकडून माफक दर साधारणत: ५०० रुपये आकारून डायलिसीसची सेवा देता येईल. त्यासाठी डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना नगरसेविका वैजयंती घोलप आणि रमेश म्हात्रे यांनी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही रुग्णालयांत डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ असा एकूण ९० पदे भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारदरबारी पडून आहे. त्याला मंजुरी दिली गेलेली नाही. आघाडी सरकारनेही पदे भरतीचे घोंगडे भिजत ठेवले. सरकार बदलून एक वर्ष लोटले तरी हा प्रस्ताव सरकारदरबारी धूळखात पडला आहे. मंजूर पदांच्या मागणीत दोन किडनीतज्ज्ञ विकारांची आवश्यकता आहे. २०१२ साली गुजरातमधील एका संस्थेने कल्याण-डोंबिवलीत माफक दरात डायलिसीस सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार दर्शविला होता. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय बारगळला.