शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

डॉ. किणीकर यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:27 IST

अंबरनाथ मतदारसंघ; काँग्रेसच्या उमेदवाराकडून आव्हान

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चुरशीची वाटणारी लढत एकतर्फी झाली. शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत मनसेला मागे सारत वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांनीही चांगला प्रभाव टाकत १६ हजारांहून अधिक मते घेतली. तर, मनसेचे उमेदवार सुमेध भवार हे चौथ्या क्रमांकावर राहिले.

अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युतीमुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी आशा होती. मात्र, काँग्रेसकडून आलेले उमेदवार साळवे यांनी किणीकर यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. काँग्रेसच्या उमेदवाराने अंबरनाथसह उल्हासनगरमध्येही वातावरणनिर्मिती केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, निकालाच्या दिवशी अंबरनाथच्या मतदाराने शिवसेनेचे किणीकर यांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. २२ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत किणीकर यांना ५९ हजार ७४१ मते मिळाली, तर साळवे यांना ३० हजार ६४५ मते मिळाली. तिसºया क्रमांकावर राहिलेले धनंजय सुर्वे यांना १६ हजार १९२ मते मिळाली. तर, मनसेचे सुमेध भवार हे १३ हजार ५९३ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.

या निकालानंतर किणीकर यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे साळवे वगळता सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. किणीकर हे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यांची आघाडी ही बाराव्या फेरीनंतर वेगात पुढे सरकली. किणीकर यांनी साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत हा विजय किणीकरांसाठी विक्रमी ठरला आहे.

अंबरनाथ : गेल्या विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील विजय हा बालाजी किणीकरांसाठी दिलासादायक होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किणीकर यांना अल्प मताधिक्याने विजय मिळाला होता. मात्र यंदाचा विजय हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठरला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत किणीकर यांचा २० हजार मताधिक्याने विजय झाला होता. प

हिल्याच प्रयत्नात त्यांचा विक्रमी विजय झाला. त्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्त महेश तपासे यांचा पराभव केला होता. या विजयानंतर किणीकर यांना प्रथमच आमदार होण्याची संधी मिळाली. पहिल्या टप्प्यात किणीकर यांना राज्य आणि राज्याचा कारभार शिकण्यात वेळ गेला. त्यामुळे पाच वर्षात विकासकामे लांबणीवर पडली होती. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत किणीकर यांना भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची वेळ आली. मात्र ती निवडणूक किणीकर यांना चटका देऊन गेली.

शेवटच्या फेरीत मिळालेल्या मताधिक्यावर किणीकर यांचा २००० मतांनी विजय झाला. मात्र या विजयानंतर विकास कामांवर भर दिल्याने आणि शहरातील काही महत्वाचे विषय मार्गी लावल्याने त्यांना २०१९ ची निवडणूक सोपी गेली. मात्र काँग्रेसला कमी न लेखता त्यांनी आपल्या प्रचाराची धार कायम ठेवली.

रॅलीला परवानगी नसल्याने शुकशुकाटअंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विजयानंतर जल्लोष करण्याची संधी हवी तशी मिळाली नाही. किणीकर यांचा विजय झाल्यावर पालिका कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर, सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात शिवसेना शाखेच्या दिशेने निघाले. मात्र, रॅलीला परवानगी नसल्याने रॅलीचा उत्साह विजयानंतर दिसला नाही.

मतमोजणीसाठी सकाळपासून केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महात्मा गांधी विद्यालयात मतमोजणी असल्याने समोरील राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. निकालाचा कल जसजसा शिवसेनेच्या बाजूने लागू लागला, तसतशी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली. काही शिवाजी चौकात तर काही पालिकेत गर्दी करून होते. पहिल्या दोन फेरीत आघाडी मिळाल्यावर किणीकर यांचा उत्साह वाढला होता.

तर, काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे हे मतदान केंद्र परिसरात फिरकलेही नाहीत. किणीकर यांची आघाडी कायम राहिल्याने इतर उमेदवारांनीही काढता पाय घेतला. विजय निश्चित झाल्यावर ते शाळेच्या दिशेने कार्यकर्त्यांसह गेले. मात्र, पोलिसांनी रॅली आणि जल्लोषावरच निर्बंध घातल्याने फटाके वाजविण्याव्यतिरिक्त काहीच करता आले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ