शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डॉ. किणीकर यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:27 IST

अंबरनाथ मतदारसंघ; काँग्रेसच्या उमेदवाराकडून आव्हान

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चुरशीची वाटणारी लढत एकतर्फी झाली. शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत मनसेला मागे सारत वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे यांनीही चांगला प्रभाव टाकत १६ हजारांहून अधिक मते घेतली. तर, मनसेचे उमेदवार सुमेध भवार हे चौथ्या क्रमांकावर राहिले.

अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युतीमुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी आशा होती. मात्र, काँग्रेसकडून आलेले उमेदवार साळवे यांनी किणीकर यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. काँग्रेसच्या उमेदवाराने अंबरनाथसह उल्हासनगरमध्येही वातावरणनिर्मिती केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, निकालाच्या दिवशी अंबरनाथच्या मतदाराने शिवसेनेचे किणीकर यांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. २२ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत किणीकर यांना ५९ हजार ७४१ मते मिळाली, तर साळवे यांना ३० हजार ६४५ मते मिळाली. तिसºया क्रमांकावर राहिलेले धनंजय सुर्वे यांना १६ हजार १९२ मते मिळाली. तर, मनसेचे सुमेध भवार हे १३ हजार ५९३ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले.

या निकालानंतर किणीकर यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे साळवे वगळता सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. किणीकर हे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यांची आघाडी ही बाराव्या फेरीनंतर वेगात पुढे सरकली. किणीकर यांनी साळवे यांचा तब्बल २९ हजार ९६ मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत हा विजय किणीकरांसाठी विक्रमी ठरला आहे.

अंबरनाथ : गेल्या विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील विजय हा बालाजी किणीकरांसाठी दिलासादायक होता. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किणीकर यांना अल्प मताधिक्याने विजय मिळाला होता. मात्र यंदाचा विजय हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठरला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत किणीकर यांचा २० हजार मताधिक्याने विजय झाला होता. प

हिल्याच प्रयत्नात त्यांचा विक्रमी विजय झाला. त्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्त महेश तपासे यांचा पराभव केला होता. या विजयानंतर किणीकर यांना प्रथमच आमदार होण्याची संधी मिळाली. पहिल्या टप्प्यात किणीकर यांना राज्य आणि राज्याचा कारभार शिकण्यात वेळ गेला. त्यामुळे पाच वर्षात विकासकामे लांबणीवर पडली होती. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत किणीकर यांना भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची वेळ आली. मात्र ती निवडणूक किणीकर यांना चटका देऊन गेली.

शेवटच्या फेरीत मिळालेल्या मताधिक्यावर किणीकर यांचा २००० मतांनी विजय झाला. मात्र या विजयानंतर विकास कामांवर भर दिल्याने आणि शहरातील काही महत्वाचे विषय मार्गी लावल्याने त्यांना २०१९ ची निवडणूक सोपी गेली. मात्र काँग्रेसला कमी न लेखता त्यांनी आपल्या प्रचाराची धार कायम ठेवली.

रॅलीला परवानगी नसल्याने शुकशुकाटअंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात हॅट्ट्रिक करणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विजयानंतर जल्लोष करण्याची संधी हवी तशी मिळाली नाही. किणीकर यांचा विजय झाल्यावर पालिका कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर, सर्व कार्यकर्ते शिवाजी चौकात शिवसेना शाखेच्या दिशेने निघाले. मात्र, रॅलीला परवानगी नसल्याने रॅलीचा उत्साह विजयानंतर दिसला नाही.

मतमोजणीसाठी सकाळपासून केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महात्मा गांधी विद्यालयात मतमोजणी असल्याने समोरील राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. निकालाचा कल जसजसा शिवसेनेच्या बाजूने लागू लागला, तसतशी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली. काही शिवाजी चौकात तर काही पालिकेत गर्दी करून होते. पहिल्या दोन फेरीत आघाडी मिळाल्यावर किणीकर यांचा उत्साह वाढला होता.

तर, काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे हे मतदान केंद्र परिसरात फिरकलेही नाहीत. किणीकर यांची आघाडी कायम राहिल्याने इतर उमेदवारांनीही काढता पाय घेतला. विजय निश्चित झाल्यावर ते शाळेच्या दिशेने कार्यकर्त्यांसह गेले. मात्र, पोलिसांनी रॅली आणि जल्लोषावरच निर्बंध घातल्याने फटाके वाजविण्याव्यतिरिक्त काहीच करता आले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ