शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

राजकीय नशिबाचे दार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार ...

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार उघडेल या आशेवर बसलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली आहे, तसेच भाजपला सोईस्कर असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती राज्य सरकारने स्वीकारल्याने ठाण्याचा शिवसेनेचा गड सर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे.

कोरोनामुळे निवडणुका केव्हा होणार, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुका चारसदस्यीय, दोनसदस्यीय की एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळी आरक्षणे असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती सोईस्कर असते. त्याचबरोबर चारसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक-दोन मातब्बर उमेदवार निवडून आले, तर ते अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामांची जबाबदारी उचलतात. मात्र, छोट्या व प्रादेशिक पक्षांना सर्व आरक्षणांकरिता उमेदवार मिळवणे व चार प्रभागांची जबाबदारी उचलणारे मातब्बर उमेदवार हुडकून काढणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना एकसदस्यीय प्रभाग पद्धती लाभदायक ठरते. शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांनी मागील भाजप सरकारचा निर्णय बदलून एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करून भाजपची पंचाईत केली.

येणारी महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणनेच्या आधारे होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढणार नाही. वॉर्ड वाढण्याची शक्यता धूसर असल्याने उमेदवारी मिळेल व आपले राजकीय भाग्य उजळेल याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. काही लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या प्रभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये नगरसेवकांमध्ये एकमत होत नसल्याने विकासाला बाधा येत होती. प्रभागातील कामांची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून वाद होत होते. या निर्णयामुळे हे वाद शमणार आहेत.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधायची, तर चारसदस्यीय प्रभाग पद्धती अडचणीची ठरली असती. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये जागावाटप व त्यानंतर त्या प्रभागामधील नागरी कामांची जबाबदारी ही सरकारची डोकेदुखी ठरली असती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील ज्या पक्षांना जी जागा मिळेल, त्याची जबाबदारी त्या पक्षाची राहणार आहे. भाजपची मनसेसोबत युती झाली, तर या दोन पक्षांमध्ये जागावाटप होईल; अन्यथा भाजपकरिता सर्व मतदारसंघ खुले होणार असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते खुश आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे किती बंडखोरी होणार, याकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपचे लक्ष लागणार आहे.

..........