शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजकीय नशिबाचे दार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार ...

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार उघडेल या आशेवर बसलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली आहे, तसेच भाजपला सोईस्कर असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती राज्य सरकारने स्वीकारल्याने ठाण्याचा शिवसेनेचा गड सर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे.

कोरोनामुळे निवडणुका केव्हा होणार, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुका चारसदस्यीय, दोनसदस्यीय की एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळी आरक्षणे असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती सोईस्कर असते. त्याचबरोबर चारसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक-दोन मातब्बर उमेदवार निवडून आले, तर ते अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामांची जबाबदारी उचलतात. मात्र, छोट्या व प्रादेशिक पक्षांना सर्व आरक्षणांकरिता उमेदवार मिळवणे व चार प्रभागांची जबाबदारी उचलणारे मातब्बर उमेदवार हुडकून काढणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना एकसदस्यीय प्रभाग पद्धती लाभदायक ठरते. शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांनी मागील भाजप सरकारचा निर्णय बदलून एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करून भाजपची पंचाईत केली.

येणारी महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणनेच्या आधारे होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढणार नाही. वॉर्ड वाढण्याची शक्यता धूसर असल्याने उमेदवारी मिळेल व आपले राजकीय भाग्य उजळेल याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. काही लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या प्रभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये नगरसेवकांमध्ये एकमत होत नसल्याने विकासाला बाधा येत होती. प्रभागातील कामांची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून वाद होत होते. या निर्णयामुळे हे वाद शमणार आहेत.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधायची, तर चारसदस्यीय प्रभाग पद्धती अडचणीची ठरली असती. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये जागावाटप व त्यानंतर त्या प्रभागामधील नागरी कामांची जबाबदारी ही सरकारची डोकेदुखी ठरली असती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील ज्या पक्षांना जी जागा मिळेल, त्याची जबाबदारी त्या पक्षाची राहणार आहे. भाजपची मनसेसोबत युती झाली, तर या दोन पक्षांमध्ये जागावाटप होईल; अन्यथा भाजपकरिता सर्व मतदारसंघ खुले होणार असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते खुश आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे किती बंडखोरी होणार, याकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपचे लक्ष लागणार आहे.

..........