शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

राजकीय नशिबाचे दार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार ...

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढेल व आपल्या राजकीय नशिबाचे दार उघडेल या आशेवर बसलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली आहे, तसेच भाजपला सोईस्कर असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय प्रभाग पद्धती राज्य सरकारने स्वीकारल्याने ठाण्याचा शिवसेनेचा गड सर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे.

कोरोनामुळे निवडणुका केव्हा होणार, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुका चारसदस्यीय, दोनसदस्यीय की एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळी आरक्षणे असलेली चारसदस्यीय प्रभाग पद्धती सोईस्कर असते. त्याचबरोबर चारसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक-दोन मातब्बर उमेदवार निवडून आले, तर ते अन्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामांची जबाबदारी उचलतात. मात्र, छोट्या व प्रादेशिक पक्षांना सर्व आरक्षणांकरिता उमेदवार मिळवणे व चार प्रभागांची जबाबदारी उचलणारे मातब्बर उमेदवार हुडकून काढणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना एकसदस्यीय प्रभाग पद्धती लाभदायक ठरते. शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांनी मागील भाजप सरकारचा निर्णय बदलून एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करून भाजपची पंचाईत केली.

येणारी महापालिका निवडणूक २०११ च्या जनगणनेच्या आधारे होणार असल्याने प्रभागांची संख्या वाढणार नाही. वॉर्ड वाढण्याची शक्यता धूसर असल्याने उमेदवारी मिळेल व आपले राजकीय भाग्य उजळेल याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना धक्का बसला आहे. काही लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक नगरसेवकाला आपापल्या प्रभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये नगरसेवकांमध्ये एकमत होत नसल्याने विकासाला बाधा येत होती. प्रभागातील कामांची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून वाद होत होते. या निर्णयामुळे हे वाद शमणार आहेत.

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधायची, तर चारसदस्यीय प्रभाग पद्धती अडचणीची ठरली असती. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये जागावाटप व त्यानंतर त्या प्रभागामधील नागरी कामांची जबाबदारी ही सरकारची डोकेदुखी ठरली असती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील ज्या पक्षांना जी जागा मिळेल, त्याची जबाबदारी त्या पक्षाची राहणार आहे. भाजपची मनसेसोबत युती झाली, तर या दोन पक्षांमध्ये जागावाटप होईल; अन्यथा भाजपकरिता सर्व मतदारसंघ खुले होणार असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते खुश आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपामुळे किती बंडखोरी होणार, याकडे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपचे लक्ष लागणार आहे.

..........