शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नागरीकरणाने वेढली आहे डोंबिवली एमआयडीसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीची (एमआयडीसी) स्थापना १९६४ मध्ये झाली, तेव्हा या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीची (एमआयडीसी) स्थापना १९६४ मध्ये झाली, तेव्हा या परिसरात नागरीकरण झालेले नव्हते. त्यावेळी ग्रामपंचायतीचा कारभार आसपास सुरू होता. नागरीकरण झाले नसल्याने, त्यावेळी काही धोका नव्हता. मात्र, ३४७ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यात आली होती. यापैकी बहुतांश शेतजमीन होती. त्यामुळे या परिसरात आता शेतीच शिल्लक नाही. डोंबिवली एमआयडीसी आता नागरीकरणाने वेढली गेली आहे.

डोंबिवली एमआयडीसीला लागूनच सोनारपाडा, दावडी, माणगाव, मानपाडा, सागाव, आजदे, सागर्ली आदी गावे आहेत. त्यावेळी हा ग्रामीण भाग होता. या ग्रामीण भागातील शेतजमीन बाधित झाली होती. डोंबिवली एमआयडीसीचे दोन फेज असून, त्यात ४२० कारखाने आहेत. त्यात टेक्सटाइल, फार्मा, इंजिनिअरिंग, रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे.

डोंबिवली एमआयडीसीत इंडस्ट्रीयल टाऊनशीप करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो होऊ शकला नाही. त्याचबरोबर इंडस्ट्रीयल क्लस्टरचाही प्रयत्न झाला असून, तोही कागदावरच आहे. डोंबिवली एमआयडीसीचा भाग हा कधी नगरपरिषदेत, कधी महापालिकेत, तर कधी महापालिकेतून वगळून पुन्हा महापालिकेत समाविष्ट केला गेला. सरकारच्या या धरसोड वृत्तीचा फटका उद्योग मालकांना बसला. या औद्योगिक विभागाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केलेले आहेत. कारखान्यांना आगी लागण्याच्या घटनांसह होणारे स्फोटही या एमआयडीसीकरिता नित्य नियमाची बाब झाली आहे.

----------------

बफर झोन राहिला नाही

डोंबिवली एमआयडीसीतील दोन्ही फेजभोवती नागरी वस्ती आहे. नागरी वस्ती आणि उद्योग यांच्यात बफर झोन राहिलेला नाही. प्रोबेस कंपनीतील स्फोटामुळे ही बाब प्रकर्षाने उघडकीस आली. धोकादायक कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी होऊ लागली. प्रोबेसनंतरही काही कारखान्यात स्फोट झाले तरी सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारी यंत्रणा ढिम्म आहे. काही कारखान्यांमध्ये वर्षभरात भीषण आगीच्या घटना घडतात. त्यासाठीही कोणतीही ठोस उपाययोजना नाही.

---------------

नवे उद्योग आले नाहीत

१९६४ मध्ये सुरू झालेल्या औद्योगिक क्षेत्रात टप्प्याटप्प्याने भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यावर जे आहेत, तेच उद्योग सुरू आहेत; मात्र त्यानंतर नवे उद्योग आले नाही. याउलट असलेलेच काही उद्योग बंद पडले. न्यायालयीन खटले, कामगारांचे प्रश्न, आर्थिक डबघाई या कारणामुळे उद्योग बंद पडले. ‘प्रीमिअर’सारखी मोठी कंपनी बंद पडली. त्या जागेवर आता मोठे गृहसंकुल उभारले जात आहे. मोदी सरकारच्या काळात इन्स्पेक्टर राज संपुष्टात आले असले तरी नवे उद्योग आले नाहीत. मधल्या काळात काही उद्योग स्थलांतरित होतील, असे सांगण्यात येत होते.

------------------

रोजगार मिळतोय

१. मी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले आहे. मी एमआयडीसीत दोन-तीन कंपन्यांमध्ये अर्ज केला होता. त्याठिकाणाहून मला प्रतिसाद मिळाला. ज्या कंपनीत बऱ्यापैकी पगार मिळेल तेथील नोकरी स्वीकारणार आहे.

- सुरेश आकडे

२. मी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनमध्ये माझ्या हाताला काम नव्हते. मात्र अनलॉकनंतर मला एका कंपनीतून कामासाठी बोलावणे आले आहे. डोंबिवली एमआयडीसीतील फार्मा कंपनीतून कॉल आला आहे.

- जालिंदर कांबळी

३. मी आयटी विभागाशी संबंधित कोर्स केला आहे. माझ्या हाताला काम नाही;मात्र एका मित्राच्या शिफारशीनुसार एका कंपनीत काम मिळण्याची शक्यता आहे. तेथे प्रयत्न करीत आहे.

- सुजय बनसोडे

--------------

डोंबिवली एमआयडीसीची स्थापना-१९६४

औद्योगिक क्षेत्रफळ-३४७.८८ हेक्टर

भूखंड-१५२८

एकूण कारखाने-४२०

-----------------