शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा करू नका, असे पत्र मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वीच ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा करू नका, असे पत्र मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वीच महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे.

सूर्यवंशी यांनी या पत्रात म्हटले आहे की,‘ज्या बिल्डरांना मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे, त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले पाहिजे. मात्र, काही जण मनपाची परवानगी न घेताच बेकायदा बांधकामे करीत आहेत. ही बेकायदा बांधकामे सरकारी आणि आरक्षित भूखंडांवर केली जात आहेत. बेकायदा इमारती आणि चाळीत घरे घेणाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते. ती टाळण्यासाठी एखाद्या बिल्डरने वीजपुरवठ्यासाठी अर्ज केल्यास त्याच्याकडे मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे का, याची शहानिशा करावी. बांधकाम परवानगी असेल तरच त्या बिल्डरला वीजपुरवठा करावा, अन्यथा वीजपुरवठा करू नये. बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्यास तो मनपाच्या सुनियोजित विकासाला बाधक ठरू शकतो. तसेच बेकायदा इमारतीत अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही महावितरण कंपनीवर येऊ शकते.’

दरम्यान, मनपाने मागील दीड वर्षात ६२० बेकायदा इमारती तसेच धोकादायक इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत.

सदस्यांनी अनेकदा उठवला आवाज

बेकायदा बांधकामाचे वीज आणि पाणी तोडले पाहिजे. विजेचा प्रश्न महावितरण कंपनीकडे आहे. मात्र, बेकायदा बांधकामांना नळजोडणी मनपाकडून दिली जात असल्याची ओरड अनेकदा सदस्यांनी महासभेत केली आहे. करपात्र नागरिकांचे पाणी बेकायदा बांधकाम करणारे पाणीचोर करीत आहेत.

तोंडदेखलेपणासाठी कारवाई

जेथे कायद्याचे उल्लंघन होते, तेथे कारवाईदरम्यान वीज, पाणीपुरवठा खंडित केला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा काही दिवस अथवा महिन्यांनी वीज आणि पुरवठा पुन्हा जोडून दिला जातो. त्यामुळे ही कारवाईही तोंडदेखलेपणासाठी केली जाते.

----------------------------------