शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा करू नका, असे पत्र मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वीच ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा करू नका, असे पत्र मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वीच महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे.

सूर्यवंशी यांनी या पत्रात म्हटले आहे की,‘ज्या बिल्डरांना मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे, त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले पाहिजे. मात्र, काही जण मनपाची परवानगी न घेताच बेकायदा बांधकामे करीत आहेत. ही बेकायदा बांधकामे सरकारी आणि आरक्षित भूखंडांवर केली जात आहेत. बेकायदा इमारती आणि चाळीत घरे घेणाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते. ती टाळण्यासाठी एखाद्या बिल्डरने वीजपुरवठ्यासाठी अर्ज केल्यास त्याच्याकडे मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे का, याची शहानिशा करावी. बांधकाम परवानगी असेल तरच त्या बिल्डरला वीजपुरवठा करावा, अन्यथा वीजपुरवठा करू नये. बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्यास तो मनपाच्या सुनियोजित विकासाला बाधक ठरू शकतो. तसेच बेकायदा इमारतीत अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही महावितरण कंपनीवर येऊ शकते.’

दरम्यान, मनपाने मागील दीड वर्षात ६२० बेकायदा इमारती तसेच धोकादायक इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत.

सदस्यांनी अनेकदा उठवला आवाज

बेकायदा बांधकामाचे वीज आणि पाणी तोडले पाहिजे. विजेचा प्रश्न महावितरण कंपनीकडे आहे. मात्र, बेकायदा बांधकामांना नळजोडणी मनपाकडून दिली जात असल्याची ओरड अनेकदा सदस्यांनी महासभेत केली आहे. करपात्र नागरिकांचे पाणी बेकायदा बांधकाम करणारे पाणीचोर करीत आहेत.

तोंडदेखलेपणासाठी कारवाई

जेथे कायद्याचे उल्लंघन होते, तेथे कारवाईदरम्यान वीज, पाणीपुरवठा खंडित केला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा काही दिवस अथवा महिन्यांनी वीज आणि पुरवठा पुन्हा जोडून दिला जातो. त्यामुळे ही कारवाईही तोंडदेखलेपणासाठी केली जाते.

----------------------------------