शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

अंत्योदय अन्न योजनेपासून दिव्यांग वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

डोंबिवली : केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी राज्यात अंत्योदय अन्न योजना मंजूर केली, परंतु गेल्या आठ वर्षांत वाढलेली लोकसंख्या ...

डोंबिवली : केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी राज्यात अंत्योदय अन्न योजना मंजूर केली, परंतु गेल्या आठ वर्षांत वाढलेली लोकसंख्या पाहता इष्टांकात वाढ करून द्यावी किंवा इष्टांकाच्या मर्यादेची अट रद्द करावी. अन्यथा या योजनेपासून दिव्यांग वंचित राहतील आणि ती कागदावरच शोभून दिसेल असे निवेदन डोंबिवलीतील दिव्यांग ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सांगळे यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना शनिवारी दिले.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड व अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने इष्टांकाच्या मर्यादेतच लाभार्थ्यांची निवड करावी तसेच या योजनेच्या इष्टांकाच्या मर्यादेत वाढ होत असले तर पूर्वी निवडलेल्या लाभार्थ्यांच्या पात्रतेकरिता पडताळणी करून जे अपात्र आढळून येतील त्यांचा समावेश बीपीएल लाभार्थीमध्ये करावा असे नमूद केले आहे. या योजनेत समाविष्ट केलेल्या २५ लाभार्थी घटकांसाठी आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने २५ लाख ५ हजार ३०० इतका इष्टांक मंजूर केला होता. योजनेतील पंचवीस लाभार्थी घटकांपैकी एक घटक असलेल्या अपंग कुटुंब प्रमुखाची राज्यातील संख्या अंदाजे किमान पाच लाख आहे. इष्टांक उपलब्ध नसल्याचे कारण सांगून शिधावाटप आणि वितरण अधिकारी दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यास असमर्थता दर्शवून योजनेपासून वंचित ठेवत असल्याकडे दत्तात्रय सांगळे यांनी लक्ष वेधले आहे. वाढलेली लोकसंख्या पाहता इष्टांकात वाढ करून द्यावी, अथवा इष्टांक मर्यादेची अट रद्द करावी तसेच ज्या कुटुंबात कुटुंब प्रमुख्याव्यतिरिक्त अन्य दिव्यांग सदस्य असतील त्यांना बीपीएल अन्न योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सांगळे यांनी आव्हाड आणि शिंदे यांच्याकडे केली आहे.

------