शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ-बदलापूरला दुषित पाणी पुरवठा

By admin | Updated: July 29, 2015 00:06 IST

आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ

बदलापूर : आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ आणि बदलापूर शहर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्याने गेल्या आठवड्याभरापासुन दोन्ही शहरात दुषित पाणी परवठ्याचे प्रमाण वाढले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराला उल्हासनदीवरील बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केले जाते. या धरणातून पाणी उचलून त्यावर बॅरेज येथील जलशुध्दीकरण केंद्रातच प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा केले जाते. मात्र धरणातून उचलण्यात येणा-या पाण्यात मातीचे प्रमाण जास्त असल्याने या जलशुध्दीकरण केंद्रात या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे दोन्ही शहरांना दूषित आणि माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. उल्हासनदीपात्रात बदलापूरातील केमिकल कंपनीचे रसायन मिश्रीत पाणी देखील सोडण्यात येत असल्याने या पाण्यावर योग्य प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरुन शुध्दीकरण प्रक्रियेत त्रुटी असल्याचे दिसत आहे. त्यातही जलशुध्दीकरण पंपिंगची यंत्रणाही कालबाह्य झाल्याने ते बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसतो आहे.नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात: अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बॅरेज धरण क्षेत्रातच नविन २२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.मात्र या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पंिपंगची सर्व यंत्रणा उभारण्याचे काम शिल्लक असल्याने हे केंद्र सुरु होण्यास आणखी ३ महिने लागणार आहे. त्यामुळे अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी विलंब होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्यानेच आणि या यंत्रणेची क्षमता कमी असल्याने अंबरनाथ शहराला कमी पाणी पुरवठा होत आहे. नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यास शहराला २ दशलक्ष लिटर्स एवढा जास्त पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीकडून जादा पाण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात निर्णय झाल्यास अंबरनाथ पश्चिम विभागासाठी २ दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी पुरवठा मिळणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळाल्यास पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.