शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 13:58 IST

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष , नागरिकांना नाक मुठीत धरून करावा लागतो प्रवास  

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी निजामपूर शहर महानग पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या शहरात फज्जा उडाला असून शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबडीकडे मनपा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने सुज्ञ नागरिकांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पालिकेच्या विविध प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास ठेकेदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे . शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांची रस्त्यावरून प्रवास करताना मोठी गैरसोय होत असून स्थानिकांना नाक मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे . 

भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असतांना मनपाचे काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारे कचऱ्याचे मोठं मोठे ढीग साचत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री अशा दोन पाळयात कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत. या दुर्लक्षित कारभारा मुळे शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेशाचे तीन तेरा वाजले आहेत. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटा गाडी ठेकेदारावर सुमारे ९० लाख रुपये खर्च करीत आहे, असे असताना स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारा कडुन नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक ताकजररी नागरिक वेळोवेळी करीत आहेत . तसेच ,औषध फवारणी देखील वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना अरोडायच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे