शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 13:58 IST

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष , नागरिकांना नाक मुठीत धरून करावा लागतो प्रवास  

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी निजामपूर शहर महानग पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या शहरात फज्जा उडाला असून शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबडीकडे मनपा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने सुज्ञ नागरिकांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पालिकेच्या विविध प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास ठेकेदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे . शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांची रस्त्यावरून प्रवास करताना मोठी गैरसोय होत असून स्थानिकांना नाक मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे . 

भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असतांना मनपाचे काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारे कचऱ्याचे मोठं मोठे ढीग साचत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री अशा दोन पाळयात कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत. या दुर्लक्षित कारभारा मुळे शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेशाचे तीन तेरा वाजले आहेत. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटा गाडी ठेकेदारावर सुमारे ९० लाख रुपये खर्च करीत आहे, असे असताना स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारा कडुन नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक ताकजररी नागरिक वेळोवेळी करीत आहेत . तसेच ,औषध फवारणी देखील वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना अरोडायच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे